
पुढारी ऑनलाईन डेस्क : सिंधुदुर्ग जिल्हा निसर्ग संपन्नतेने नटलेला जिल्हा आहे. येथील पर्यटन वाढीसाठी सर्वकाही करण्याची राज्य सरकारची तयारी आहे. पर्यटनाला चालना देण्यासाठी आंबोलीत नवीन हिल स्टेशन उभारण्यात येईल, मुंबई- गोवा महामार्गाला चालना देण्यात येईल. तसेच चिपी विमानतळाला बॅरिस्टर नाथ पै यांचे नाव देण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज (दि.६) सावंतवाडी येथे केली. यावेळी विविध विकासकामांचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
हेही वाचा