राजापूर; पुढारी वृत्तसेवा : राजापूर शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या पवार इलेक्ट्रॉनिक दुकानाला बुधवारी (दि.५) मध्यरात्री भिषण आग लागली. या आगीत दुकान पूर्णतः जळून खाक झाले असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आगीमुळे बाजूला असणाऱ्या दुकानांचेही नुकसान झाले आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. अचानक लागलेल्या या आगीत पवार इलेक्ट्रॉनिक्स आणि शेजारील साने यांचे दुकान भर पावसामध्ये जळून खाक झाले. दोन्ही दुकानांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. पवार यांच्या दुकानात ईलेक्ट्रॉनिक वस्तू विक्रीसाठी होत्या त्या जळून खाक झाल्या. यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. आग लागल्याचे समजताच नागरीक आणि प्रशासनाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशामन दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली. नेमकी आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही.









LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here