शिवसेनेने पुन्हा भाजपशी युती करावी अशा आशयाचं प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र
मुंबई: पालिका निवडणुकांच्या तोंडावर पुन्हा युती केली तर शिवसेनेला फायदा होईल, अशी विनंती शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केल्याची चर्चा आहे. सत्तेत असलेले राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे दोन पक्ष आपलेच कार्यकर्ते फोडत आहेत आणि आपला पक्ष कमकुवत होत चालला आहे. अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींशी जुळवून घेतलेले बरे होईल, असे पत्रात सरनाईक यांनी लिहिलं आहे. तसेच, सध्या शिवसेनेच्या काही लोकांना कोणताही गुन्हा किंवा चूक नसताना केंद्रीय तपास यंत्रणांकडून नाहक त्रास सुरु आहे. मोदींशी जुळवून घेतल्यास आम्हाला व आमच्या कुटुंबीयांना होणारा नाहक त्रास तरी थांबेल अशी अनेक कार्यकर्त्यांची भावना आहे, असेही पत्रात नमूद केले आहे. या पत्रावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सावध पण रोखठोक प्रतिक्रिया दिली. (Shivsena Pratap Sarnaik Letterbomb Sanjay Raut reaction targets National Investigation Agency)
Also Read: भाजपशी जुळवून घ्या, शिवसेना आमदाराची उद्धव ठाकरेंकडे मागणी
“प्रताप सरनाईक यांनी जर पत्रातून काही मत मांडलं असेल तर त्यात प्रतिक्रिया देण्यासारखं काहीच नाही. त्यांच्या पत्रात एक महत्त्वाचं वाक्य आहे की शिवसेनेच्या काही नेतेमंडळींना विनाकारण त्रास दिला जातोय. कोण, कोणाला आणि का विनाकारण त्रास देत आहे हा या पत्रामधला महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यासंदर्भात आमचा अभ्यास सुरू आहे”, अशा शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

नक्की काय लिहिलंय त्या पत्रात…
, असं पत्रात लिहिलं आहे.
Esakal