रानातील भाज्या या कुठल्याही प्रकारचे बियाणे व खतांचा वापर न करता जंगलात सहजपणे उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे. जंगलातील भाज्या आदिवासींना शेती कामाच्या पावसाळ्याच्या दिवसांत पौष्टिक व परवडणारे खाद्य म्हणून शेतमजुरांच्या खाद्यात मोठया प्रमाणात वापरल्या जातात.
विशेष म्हणजे रोजगारासाठी इतरत्र भटकावे लागत असते, कठोर मेहनत करून पोटासाठी दोन पैसे मिळवावे लागतात. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नव्वद टक्के समाज हा आदिवासी आहे. हा समाज जंगल खोऱ्यात राहत आहे. त्याला आपला उदरनिर्वाह भागविण्यासाठी रानमेव्याचा हातभार लागत आहे. रानात दिवसभर फिरून आदिवासी रानभाज्या जमा करतात. या जमा केलेल्या भाज्या त्र्यंबकेश्वर, गिरणारे, हरसूल बाजारपेठेत तसेच वाघेरा घाट व अंबोली घाट रस्त्यात विक्रीसाठी उपलब्ध असतात.







Esakal