साताऱ्याच्या पश्चिमेस सुमारे 18 किलोमीटर अंतरावर सज्जनगड आहे. समर्थ रामदास स्वामी यांनी तेथे तपश्चर्या केली होती. राममंदिरही उभारले आहे, तसेच समर्थ रामदास स्वामी यांची गडावरच समाधी आहे. तेथून पुढं ठाेसेघर, चाळकेवाडी येथील निसर्गात आनंद लुटण्यासाठी पावसाळ्यात पर्यटकांची गर्दी असते.






वनकुसवडे : चाळकेवाडी व वनकुसवडे परिसरातील पठारावर पवनऊर्जा प्रकल्पातील सुमारे अडीच हजार पवनचक्क्या पाहायला मिळतात. विविध कंपन्यांनी उभारलेल्या पवनऊर्जा प्रकल्पामुळे वीजनिर्मिती होऊ लागली आहे. पावसाळ्यात हा परिसर धुक्यांनी भरलेला असतो.
Esakal