नाशिक : वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात. हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा” (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो. वटपौर्णिमा उत्सवाचे औचित्य साधून नाशिक शहर आणि जिल्ह्यात निर्माल्य दान उपक्रमाचे तनिष्का गटांतर्फे आयोजन करण्यात आले होते. तसेच पूजेच्या ठिकाणी जमा होणारा कचरा आणि निर्माल्य एकत्रित करत तनिष्का भगिनींतर्फे परिसर स्वच्छ राखण्यासाठी पुढाकार घेण्यात आला.





Esakal