कोल्हापूर : नुकतीच पेरणीची कामं संपली आणि मृग नक्षत्राच्या पावसाने दमदार एंट्री केली. पावसाचा जोर तुलनेत अधिक असल्याने आणि धरण क्षेत्रात पावसाच्या संततधारेने पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली. परिणामी पाणी पात्राबाहेर पडले आणि शेतशिवारात घुसले. परंतु दोन दिवसाच्या दमदार एंट्रीनंतर पावसाने उघडीप दिली. पेरणीनंतर लगचेच झालेल्या या पावसाचा भातशेतीला फायदा झाला आहे. भरली हिरवागार रानं तरुच्या (भाताच्या) रोपांनी डोलत आहेत. जिल्ह्याच्या चहुबाजूला पसरलेला हिरव्या रानात सध्या रोपांची धांदल सुरु झाली आहे. कोल्हापूर ग्रामीण भागात रोपलावणीने घाई घेतली असून शेतकरीवर्ग रोपांच्या गडबडीत आहे. कोल्हापूरपासून काही अंतरावर असलेल्या कोपार्डे गावातील शेतकऱ्यांची रोपलावणीची लगबग कॅमेरातून टिपली आहे, आमचे ‘सकाळ’चे छायाचित्रकार नितीन जाधव यांनी..









Esakal