सातारा : अतिवृष्टी (Patan Taluka Landslide) झालेल्या नुकसानीपोटी विशेष बाब म्हणून सातारा जिल्ह्याला शंभर कोटी रुपयांचा निधी देण्याबरोबर या घटनेत मृत्यू (Ambeghar Landslide) झालेल्या प्रत्येक व्यक्तीमागे सात लाख रुपयांची मदत देणार असल्याचा निर्णय आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Deputy Chief Minister Ajit Pawar) यांनी जाहीर केला आहे. सांगली येथे पूरग्रस्त भागाची पाहणी करून पवार यांनी सातारा येथे जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीस विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर (Ramraje Naik-Nimbalkar), पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील, आमदार शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. दीपक चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, जिल्हाधिकारी शेखर सिंह, कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलिस अधीक्षक अजय कुमार बन्सल आदी उपस्थित होते. (Patan Landslide Deputy Chief Minister Ajit Pawar Pledged To Give 100 Crore To Satara District bam92)

दरवर्षी जोरदार पावसाने दुर्गम भागात ओढे व नाल्यावरील ब्रिटिशकालीन मोरी वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत.

नैसर्गिक घटनांशी सामना करण्यासाठी चांगल्या दर्जाच्या बोटी व वस्तूंची खरेदी करा. दरवर्षी जोरदार पावसाने दुर्गम भागात ओढे व नाल्यावरील ब्रिटिशकालीन मोरी वाहून जाण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे, अनेक गावे संपर्कहीन होताना दिसून येत आहे. या दुर्घटना टाळण्यासाठी मोरी बांधण्याऐवजी स्लॅबचे पूल सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत बांधावेत. तसेच, गेल्या चार दिवसापासून सुरु असलेल्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या घरांचे पंचनामे आठवडाभरात पूर्ण करण्याचे आदेश देत बाधित नागरिकांना चांगली घरे देणार असल्याचे आश्‍वासन पवार यांनी दिले आहे. तसेच, कोयना वसाहतीतील घर दुरुस्तीसाठी निधी देणार आहे. याचबरोबर भूस्खलन झालेल्या लोकांना महसूल आणि वनविभागाच्या जागा उपलब्ध करून द्या, असे सांगत पवार यांनी ज्या गावात गरज आहे तिथेच काम करा, असेही बजावले.

Ajit Pawar

अतिवृष्टीत नुकसान झाले आहे त्यांचे पुनर्वसन जलसंपदा अथवा वनविभागाच्या जागेत करावी, अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांनी केली. दरम्यान, अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याशी असणाऱ्या घरांना दगडाचा धोका आहे. त्यामुळे त्याचा सर्व्हे करून सातारा पालिकेला त्यात सहभागी करून घ्यावे, असे आदेश पवारांनी दिले. यावर अजिंक्यतारा किल्ला संरक्षण भिंतीचे काम करणे आवश्यक असल्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगताच यासाठी किती निधी आवश्यक आहे, याची माहिती उद्या संध्याकाळपर्यंत पाठवा, असे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

Also Read: PM योजनेतून आपत्तीग्रस्तांचे पुनर्वसन करु; रामदास आठवलेंची ग्वाही

NDRF उभारण्याची मागणी करणार

अजित पवार यांनी बैठकीत सांगितलेल्या प्रत्येक बाबींची पूर्तता १५ ऑगस्टपर्यंत करण्याचे आदेश देत या बाबतीत मी कोणाचे ऐकणार नसल्याचेही अधिकाऱ्यांना सुनावले. तसेच, दुर्घटनाग्रस्त भागात तातडीने मदत मिळण्यासाठी एनडीआरएफच्या (NDRF Team) धर्तीवर पश्‍चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासाठी कऱ्हाड येथे एसडीआरएफ केंद्र व्हावे, अशी मागणी करणार असल्याचे अजित पवारांनी सांगितले.

Patan Landslide Deputy Chief Minister Ajit Pawar Pledged To Give 100 Crore To Satara District bam92

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here