नाशिक : नाशिककरांना पाणीपुरवठा होणाऱ्या गंगापूर धरणातील साठाही ८० टक्क्यांपर्यंत पोचला असून, या धरणातून आज (ता.२९) सकाळी १० ला ५०० क्यूसेक्स विसर्ग करण्यात आला आहे. (Gangapur-dam-80-percent-full-marathi-news-jpd93)




खरिपाच्या ७९.५१ टक्के पेरण्या
जिल्ह्यात खरिपाच्या आतापर्यंत ७९.५१ टक्के पेरण्या झाल्या आहेत. भाताच्या रोपांची लागवड ६२ टक्क्यांच्या पुढे पोचली आहे. मालेगाव, बागलाण, नांदगाव, देवळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी ज्वारीची पेरणी केली असून, सर्वसाधारण ५५४ हेक्टरहून अधिक म्हणजेच, ९६२ हेक्टरवर पेरण्या झाल्या आहेत. बाजरीचे पेरणी क्षेत्र ५९ टक्के झाले आहे. मक्याची लागवड १०६.६६ टक्के क्षेत्रावर झाली आहे. पेरणी झालेले तुरीचे क्षेत्र ६९.४०, मुगाचे ४०.१२, उडदाचे ४३.८२, भुईमुगाचे ८८.९६, सोयाबीनचे १२५ टक्के झाले आहे. कपाशीची लागवड ८४.८७ टक्के झाली आहे.
Also Read: नाशिक, इगतपुरीत ‘CBI’चे छापे; अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ?
Also Read: नाशिक नोटप्रेस चोरी प्रकरण : आणखी 7 जण निलंबित
Esakal