विनोद खन्ना हे सत्तरच्या दशकातले आघाडीचे आणि हॅण्डसम अभिनेत्यांपैकी एक होते. आपल्या अभिनयाच्या जोरावर विनोद खन्ना यांनी ‘हिरो’ म्हणून आपली छाप पाडली. सत्तर आणि ऐंशीच्या दशकात हिंदी चित्रपटांमध्ये मल्टिस्टारर चित्रपटांचा ट्रेंड आला होता. एका चित्रपटात तीन-तीन नायक त्यामुळे या नायकांच्या गर्दीतही त्यांनी ‘हिरो’ म्हणून आपले नाणे खणखणीत वाजवले. ‘दयावान’, ‘अमर अकबर अँथनी’, ‘कुरबानी’, ‘हेराफेरी’, ‘मुकद्दर का सिकंदर’ यांसारख्या चित्रपटांमधून त्यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडली. त्यांच्याविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात..





Esakal