मुंबई : मुंबई विमानतळावर शुक्रवारी टर्मिनस 2 वर सकाळपासूनच विमान प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली आहे. विमानतळ प्रशासनाच्या अनियोजित कारभारामुळे प्रवाशांना लांबच लांब रांगेत उभे राहावे लागले असून, दरम्यान कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर कोणतेही सामाजिक अंतर प्रवाशांमध्ये दिसून आले नाही.प्रवाशांच्या रांगेमुळे अनेकांना आपले विमान पकडता आले नाही. तर संतप्त प्रवाशांसह संगीतकार आणि गायक विशाल ददलानी यांनी सुद्धा विमानतळ प्रशासनावर संताप व्यक्त करत ट्विट केले आहे..






कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर सध्या फक्त आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी टर्मिनस दोन सुरू आहे. त्यावरूनच काहीप्रमाणात देशांतर्गत उड्डाण सुद्धा केले जात आहे.
Esakal