काही लोकांना वाटतं की, मसालेदार पदार्थ सेवन केल्याने रोग प्रतिकारशक्ती वाढते. पण ते खरे आहे का? याबद्दल पुरेसे संशोधन अद्याप झालेलं नाही, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. पण जर तुम्ही मसाल्यांमध्ये हळदीबद्दल बोललात, तर हळद तुमच्या प्रतिकारशक्तीसाठी चांगली असू शकते. संशोधनात असे दिसून आले आहे की, हळदीचा वापर कोलायटिस आणि क्रोहन रोगाचे परिणाम कमी करू शकतो. पण हळदीचे नाव गरम मसाल्यात समाविष्ट करता येत नाही.
आपल्यापैकी बरेच लोक असे आहे की, ज्यांना तिखट खाल्याशिवाय जेवण करायला आवडतच नाही. बऱ्याच लोकांना तिखट मसाल्यांनी युक्त अन्नाची चव आवडते. पण हे तिखट मसाले तुमच्या आरोग्यावर काय परिणाम करतात, हे तुम्हाला माहिती आहे का? तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मिरचीमध्ये कॅप्साइसीन नावाचा घटक असतो, जो आपल्या निरोगी शरीरातील अनेक समस्या वाढवू शकतो. मिरची आणि मसालेदार पदार्थ खाल्ल्याने तुमच्या शरीरावर कोणत्या प्रकारचे परिणाम होऊ शकतात, आपण येथे पाहणार आहोत. शरीरातील कॅप्साइसिनचे प्रमाण जास्त झाल्यास आतड्यात रक्तप्रवाह उत्तेजित करते. तसेच, ते श्लेष्माचे उत्पादन वाढवू शकते. एवढेच नव्हे तर यामुळे अतिसाराची स्थिती देखील निर्माण होऊ शकते.गरम आणि मसालेदार पदार्थ जेवढे स्वादिष्ट असतात. आरोग्यासाठी तितकेच अधिक हानिकारक असू शकते. जास्त मसालेदार अन्न खाल्ल्याने अपचन आणि पोटात जळजळ होण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. तथापि, त्याचा प्रभाव प्रत्येक व्यक्तीवर सारखा नसतो. जर तुम्ही आतड्याशी संबंधित समस्यांनी त्रस्त असाल तर जास्त तिखट आणि मसालेदार पदार्थ खाणे टाळा. अन्यथा तुम्हाला अतिसार आणि उलट्या अशा तक्रारी वाढू शकतात. काही अभ्यासानुसार मसालेदार अन्न भूक वाढवते आणि त्यामुळे लठ्ठपणा वाढू शकते. त्याचवेळी काही संशोधनात असे सांगितले गेले आहे की, मसालेदार अन्न कॅलरीज बर्न करते. तसेच भूक कमी करण्यास मदत करते. म्हणूनच मसालेदार अन्न भूक वाढवते की कमी करते हे सांगणे कठीण आहे.बरेच लोक म्हणतात की, मसालेदार अन्न सेवन केल्याने अल्सरची समस्या उद्भवू शकते. पण ही गोष्ट अजून सिद्ध झालेली नाही. मसालेदार अन्न शरीराचे आम्ल उत्पादन कमी करण्यासाठी, क्षार उत्तेजित करण्यासाठी आणि रक्त प्रवाह उत्तेजित करण्यात महत्वाची भूमिका बजावते. या व्यतिरिक्त, काही लोक म्हणतात की, मसालेदार अन्न खाल्ल्याने मूळव्याध आणि कर्करोगासारखे आजार होऊ शकतात, परंतु यासाठी कोणतेही अधिकृत पुरावे नाहीत. म्हणून मसालेदार अन्नाशी संबंधित या गैरसमजांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला मसालेदार पदार्थ खूप आवडत असतील तर तुम्ही अधूनमधून असे पदार्थ खाऊ शकता. पण त्याचा जास्त वापर होणार नाही, याची काळजी घ्या. यामुळे तुमचा त्रास वाढू शकतो.
शरीरातील कॅप्साइसिनचे प्रमाण जास्त झाल्यास आतड्यात रक्तप्रवाह उत्तेजित करते. तसेच, ते श्लेष्माचे उत्पादन वाढवू शकते. एवढेच नव्हे तर यामुळे अतिसाराची स्थिती देखील निर्माण होऊ शकते.