भाजीत मिरचीचा तडका नसेल तर जेवणाची चव येणार तरी कशी, बरोबर ना. पण बऱ्याच वेळा असे होते की भाजी तयार करताना नकळत भाजीमध्ये तिखट जास्त पडते. अशा परिस्थितीत, अन्नाची संपूर्ण चवच खराब होते, जे लोकांना खायला आवडत नाही. त्याच वेळी, अनेक वेळा लोक भाज्यांमध्ये लाल रंग येण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाल मिरच्या देखील घालतात. नंतर अशी भाजी खाणे अवघड होऊन जाते आणि मग तयार केलेली संपूर्ण भाजी फेकून द्यावी लागते. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला भाजीतील तिखटपणा कमी करायचा असेल, तर चला जाणून घेऊया अशा काही टिप्स ज्याद्वारे तुम्ही भाजीतील तिखटपणा कमी करू शकता.

भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही मध आणि साखर वापरू शकता. यासाठी तुम्ही भाजीत थोडी साखर किंवा मध घाला. पण लक्षात ठेवा की मध किंवा साखर फक्त कमी प्रमाणात वापरली पाहिजे.

जर भाजीत जास्त मिरची टाकली असेल, तर त्याचा तिखटपणा कमी करण्यासाठी आपण त्यात मलई किंवा क्रिम घालू शकता. भाजीत मलई किंवा क्रिम घालून मंद आचेवर शिजवा. असे केल्याने भाजीचा तिखटपणा कमी होईल आणि त्याची चवही वाढेल.

भाजीमधील तिखटपणा कमी करण्यासाठी, तुम्ही टोमॅटो बारीक करून त्यात घालू शकता. पण लक्षात ठेवा की भाजीमध्ये टोमॅटो प्युरी घालण्यापूर्वी आधी ते हलके तळून घ्या.

भाजी जास्त तिखट झाल्यास तुम्ही त्यात लिंबाचा रस वापरू शकता. भाजीमध्ये हे वापरल्यास चव वाढेल आणि तिखटपणा कमी होईल.

जर तुम्ही चुकून भाजीत जास्त मिरची टाकली असेल, तर तुम्ही त्यात तूप किंवा लोणी घालून सहज त्याचा तिखटपणा कमी करू शकता. तूप आणि लोणीला नॅचरल गोडवा असतो, त्यामुळे भाजीमध्ये तूप किंवा लोणी घातल्याने तिखटपणा कमी होतो आणि चव वाढते.

भाजीचा तिखटपणा कमी करण्यासाठी तुम्ही मैद्याचे पीठ वापरू शकता. यासाठी आधी पीठ हलके तळून घ्या. त्यानंतर ते भाजीत मिसळा. असे केल्याने भाजीची ग्रेव्ही घट्ट होईल आणि तिखटपणाही कमी होईल.
Esakal