मुंबई – बॉलीवूड अभिनेत्री कंगनानं आपल्या वादग्रस्त वक्तव्याचा धडाका कायम ठेवला आहे. गेल्या दोन दिवसांपासून कंगनाच्या नावाची जोरदार चर्चा सुरु झाली. तिला नुकतचं पद्मश्री पुरस्कारानं गौरविण्यात आले. मात्र त्यानंतर एका कार्यक्रमामध्ये तिनं देशाच्या स्वातंत्र्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. यामुळे कंगनानं अनेकांना राग ओढावून घेतला आहे. कंगना नेहमीच तिच्या वादग्रस्त वक्तव्यांसांठी ओळखली जाते. आता पुन्हा तिनं मोठा बॉम्ब टाकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थानातील चार ठिकाणी कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कंगना पुन्हा संतापली आहे. तिनं आता तिच्या एका पोस्टमध्ये 1948 चा एक फोटो शेयर केला आहे. तो फोटो एका दस्ताऐवजाचा आहे. त्यावर पंडित नेहरु यांची सही आहे. त्यामध्ये ते बंगालचे गव्हर्नर राजागोपालचारी यांना भारताचे गव्हर्नर होण्याविषयी सांगत आहे.
त्यावर कंगनानं लिहिलं आहे की, मी अशा स्वातंत्र्याचा निषेध केला आहे जिथं भारताच्या प्रभुत्व सत्तेविषयी बोलले जात आहे. यावेळी कंगनानं एक स्माईली शेयर केली आहे.
आपल्या गेल्या पोस्टमध्ये कंगनानं म्हटलं होतं की, 1947 साली भारताला मिळालेले स्वातंत्र्य हे भीक होती. खरं स्वातंत्र्य आपल्याला आता मिळालं आहे. जेव्हा मोदी पंतप्रधान झाले तेव्हा आपल्याला खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळाल्याचं कंगनाचं म्हणणं आहे.
गेल्या दोन दिवसांपासून कंगनाचा पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा अशी मागणी होताना दिसत आहे. तिच्यावर गुन्हेही दाखल केले जात आहे.
कंगनान आता जे विधान केले आहे त्यात तिनं म्हटलं आहे की, 1857 च्या स्वातंत्र्य लढ्यासाठी सुभाषचंद्र बोस, राणी लक्ष्मीबाई आणि वीर सावरकर यांचा मोलाचा वाटा होता. मात्र 1947 साली कोणते युद्ध झाले हेच मला माहिती नाही. ते सांगा मी माझा पद्मश्री परत करेल.
मला एक गोष्ट सांगा गांधीजी यांनी भगत सिंग यांना का मरु दिलं आणि नेताजी सुभाष यांची हत्या का झाली गांधींनी त्यांना कधीच सपोर्ट का केलं नाही…असा सवाल कंगनानं केला आहे.
आता पुन्हा तिनं मोठा बॉम्ब टाकत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. राजस्थानातील चार ठिकाणी कंगनावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here