मुंबई – राजा शिवछत्रपती या ग्रंथातून महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचलेल्या बाबासाहेब पुरंदरे यांचं आज सकाळी वृध्दापकाळानं निधन झाल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यांना गेल्या आठवडाभरापासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे रुग्णालय प्रशासनानं सांगितलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यावर आधारित साहित्याची निर्मिती बाबासाहेबांनी केली होती. त्याला राज्यातल्या वाचकांनी, बाबासाहेबांच्या चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता.

बाबासाहेब हे नेहमी सांगायचे की, इतिहास ही यशाची गाथा आणि अपयशाचीही कहाणी असते. काय बरोबर आणि काय चूक हे इतिहास अभ्यासातून समजते. चुकाही अचूकपणे समजून घेतल्या पाहिजे. अशाप्रकारे बाबासाहेबांनी आपल्या व्याख्यांनातून नवोदितांना प्रेरणा दिली.
संशोधन करून इतिहासाची मांडणी केली पाहिजे. असं मत बाबासाहेब यांनी ‘ अशी अपेक्षा शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी व्यक्त केली.
राजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपण त्यातील बारकावे संशोधनाच्या दृष्टीकोनातून समजून घ्यायला हवे. त्यासाठी आपण आणखी अभ्यासूपणानं काम करायला हवं. अशी अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केली होती.
बाबासाहेबांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० वर्षे मी मंडळामध्ये अभ्यास केला,’ अशी आठवण सांगितली.
यावेळी ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांच्या हस्ते पुरंदरे यांना शतायुषी जीवनगौरव प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमाला मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
बाबासाहेबांनी ज्येष्ठ इतिहास संशोधक ग. ह. खरे यांच्या मार्गदर्शनाखाली २० वर्षे मी मंडळामध्ये अभ्यास केला,’ अशी आठवण सांगितली.
राजांच्या इतिहासाचा अभ्यास करताना आपण त्यातील बारकावे संशोधनाच्या दृष्टीकोनातून समजून घ्यायला हवे. त्यासाठी आपण आणखी अभ्यासूपणानं काम करायला हवं. अशी अपेक्षा बाबासाहेबांनी व्यक्त केली होती.
विशेषत तरुण अभ्यासकांनी इतिहासाचे लेखन करताना त्यामध्ये आणखी संशोधन करुन विषयाच्या मुळाशी जाण्याची नितांत गरज आहे. व्रतस्थपणे आपण काम करायला हवे. अशी भावना पुरंदरे यांनी व्यक्त केली होती.

Esakal

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here