मुंबई : मुंबईकरांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. कारण, बीएमसीने मुंबईत २९ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबरपर्यंत २४ तास पाणीकपात जाहीर केली आहे. या २४ तासांत १० वॉर्डांमध्ये (Mumbai water cut) पाणी टंचाई जाणवण्याची शक्यता आहे. यामुळे पूर्व आणि पश्चिम भागात पाणी टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.
ओशिवरा, लोखंडवाला, विलेपार्ले पश्चिम, अंधेरी पश्चिम आणि जुहू मेट्रो भागात २९ आणि ३० नोव्हेंबरला पाणीटंचाई जाणवणार आहे. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, पाणीपुरवठ्यात कपात करताना कूपर हॉस्पिटलला पाणीपुरवठा करण्यासाठी बीएमसीच्या टँकरचा वापर केला जाईल.