अरबी समुद्रावरील बाष्पयुक्त वाऱ्यामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. याचा परिणाम पुढचे काही दिवस राज्यात पाहायला मिळणार आहे. यातच उत्तरेकडून होणाऱ्या थंड वाऱ्यांचा अभाव कमी झाल्यामुळे राज्यात थंडीही कमी झाली आहे. दुपारी उन्हाचा चटका बसत असला तरी उकाड्यात वाढ झाली आहे. दरम्यान, गोवा, कोकण, कोल्हापूर, सातारा, पुणे या जिल्ह्यांसह राज्यातल्या इतर भागांमध्ये पावसाने हजारी लावली. त्यामुळे शेतीच्या कामांमध्ये अडथळा निर्माण झाला आहे.
Maharashtra Weather Forecast; Rain Alert in Some Districts by IMD
मुंबई : राज्यात नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात हलकीशी गुलाबी थंडी अनुभवायला मिळाली. पण आता अचानक झालेल्या हवामानातील बदलांमुळे थंडी गायब झाल्याचं पाहायला मिळत आहे. अशात हवामान खात्याकडून राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आधीच राज्यात पुणे, कोकण, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, बीड अशा महत्त्वाच्या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस झाला.