नाशिक: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष यांनी राम मंदिराच्या उभारणीबाबत केलेल्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटत आहेत. शिवसंग्रामचे नेते यांनी आज पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. ‘पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अपमान केला आहे. स्वत:ला हिंदू नेते म्हणवणारे मुख्यमंत्री आता गप्प का,’ असा सवालही मेटे यांनी केला आहे.

वाचा:

अयोध्येतील राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्याची तारीख काल केंद्र सरकारकडून निश्चित करण्यात आली आहे. त्यानुसार येत्या ५ ऑगस्ट रोजी हा भूमिपूजन सोहळा होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही भूमिपूजन सोहळ्यासाठी आमंत्रण देण्यात आलं आहे. देशात करोनाचा कहर असताना आलेल्या या वृत्तावर शरद पवार यांनी लगेचच प्रतिक्रिया दिली होती. मंदिर बांधून करोना जाईल असं काहींना वाटतं आहे, असा खोचक टोला पवारांनी हाणला होता. त्यावर भाजपच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या होत्या. विनायक मेटे यांनी आज पवारांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

‘मंदिर बांधून करोना जाणार नाही असं त्याचं म्हणणं असेल तर मंदिर न बांधून तो जाणार आहे का,’ असा प्रश्न मेटे यांनी पवारांना केला. ‘शरद पवारांनी हिंदू समाजाच्या श्रद्धेचा अवमान केला आहे. स्वत:ला हिंदू नेते म्हणवणारे मुख्यमंत्री आता मूग गिळन गप्प का? त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी,’ असं आव्हानही मेटे यांनी उद्धव ठाकरे यांना दिलं.

वाचा:

दूध दरासाठी भाजपनं आज सुरू केलेल्या आंदोलनात मेटे यांची संघटनाही उतरली आहे. जिल्हाधिकारी मांढरे यांना मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यावरही त्यांनी टीका केली. ‘राजू शेट्टी हे आता शेतकऱ्यांचे नेते राहिलेले नाहीत. त्यांची आंदोलनं दाखवण्यापुरती आहेत,’ असं मेटे म्हणाले.

उभारणीबाबत काय म्हणाले होते शरद पवार?

‘करोनामुळं जनतेला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या संकटात सापडलेल्या नागरिकांना कसं बाहेर काढायचं याचा विचार आम्ही करतोय. त्याला पहिलं प्राधान्य देतोय, पण काहींना वाटतंय मंदिर बांधून करोना जाईल. त्यामुळं त्यांनी राम मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला असावा,’ असं पवार म्हणाले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here