नवी दिल्ली : युनिफाइड पेमेंट इंटरफेस म्हणजेच UPI आजकाल पैसे ट्रान्सफर करण्याचा एक अतिशय लोकप्रिय पर्याय बनला आहे. वाढत्या डिजिटलायझेशनमुळे आजकाल एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे हस्तांतरित करणे खूप सोपे झाले आहे. युपीआयद्वारे कोणाला पैसे देण्यासाठी तुम्हाला क्रेडिट आणि डेबिट कार्डचीही गरज भासणार नाही. आणि हे काम तुम्ही तुमच्या मोबाईल नंबरनेच घरबसल्या किंवा बाहेर फिरतानाही करू शकता.

करोनाच्या काळात युपीआय वापरणाऱ्यांची संख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. आजकाल लोक गूगल पे, फोन पे, पेटीएम अशा असंख्य युपीआय ॲप्सद्वारे सहजपणे पैसे ट्रान्सफर करू शकतात. पण अनेक वेळा युपीआयमधून पैसे ट्रान्सफर करताना चुकीच्या खात्यात पैसे जाण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा परिस्थितीत तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. काही सोप्या स्टेप्स फॉलो करून तुम्ही तुमचे पैसे परत मिळवू शकता.

करदात्यांच्या कामाची बातमी! आता UPI, क्रेडिट कार्डद्वारेही भरता येणार इन्कम टॅक्स, कसं ते जाणून घ्या
भीम ॲपसाठी काय आहे नियम
भीम ॲपच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने या युपीआय ॲपवरून दुसऱ्याच्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले असतील तर त्याला त्याचे पैसे पुन्हा मिळू शकत नाहीत. यासाठी तुम्हाला रिसीव्हरला तुमचे पैसे पुन्हा ट्रान्सफर करण्याची विनंती करावी लागेल. अशा परिस्थितीत जर तुम्ही भीम ॲपवरून एखाद्याला पैसे ट्रान्सफर करत असाल तर त्यापूर्वी त्याचा सर्व तपशील तपासणे अत्यंत आवश्यक आहे. पैसे प्राप्तकर्त्याचे सर्व तपशील तपासल्यानंतरच पैसे ट्रान्सफर करा, नाहीतर तुमचे मोठे नुकसान होईल.

युरोप फिरताना आता खर्च करणं सुलभ, UPI द्वारे पेमेंटचीही सुविधा
तक्रार कुठे करायची?
लक्षात ठेवा की पैसे चुकून ट्रान्सफर झालेल्या व्यक्तीची दया झाल्यावरच तुम्हाला तुमचे पैसे पुन्हा मिळू शकतील, पण तुम्ही त्याबद्दल नक्कीच तक्रार करू शकता. तुमचे पैसे गुगल पे, फोन पे, पेटीएम, भारत पे इत्यादी ॲप्सवरून त्यांच्या सपोर्ट सिस्टममध्ये जाऊन तुमची तक्रार नोंदवा. याशिवाय भीम ॲप वापरकर्ते त्यांच्या टोल फ्री हेल्पलाइन क्रमांक १८००१२०१७४० वर जाऊन तक्रारी नोंदवू शकतात.

बँकेलाही कळवा
दरम्यान, जर तुमचे पैसे चुकीच्या खात्यात ट्रान्सफर झाले असतील, तर लगेच त्या खाते क्रमांकाचा स्क्रीनशॉट घ्या. यानंतर तुम्ही ज्या बँकेच्या खात्यात पैसे पाठवले आहेत त्या बँकेशी संपर्क साधा. यानंतर, गरज पडल्यास आपण बँकेच्या व्यवस्थापकाशी देखील बैठक घेऊ शकता. यानंतर बँका तुम्हाला तुमचे पैसे परत मिळवून देण्यासाठी मदत करू शकतात. मात्र, काळजी घ्या की तुम्ही लवकरात लवकर तक्रार केली आहे आणि जितक्या लवकर तुम्ही बँकेला तपशील द्याल तितके पैसे परत मिळण्याची शक्यता जास्त असेल.

UPI पेमेंट करताना ‘या’ चुका टाळा, नाहीतर मिनिटात रिकामे होईल बँक खाते
रिझर्व्ह बॅंकेचा नियम
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) नियमांनुसार चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्याची तक्रार मिळाल्यानंतर बँकेला ७ ते १५ दिवसांच्या आत तक्रार निकाली लावावी लागते. अशा परिस्थितीत चुकीच्या खात्यात पैसे ट्रान्सफर झाल्यास संबंधित बँक शाखा आणि बँक अधिकाऱ्याशी लवकरात लवकर संपर्क करा. जर त्या व्यक्तीने तुम्ही चुकून पाठवलेले पैसे खर्च केले तर नियमांनुसार बँकेला तुमचे पैसे परत करावे लागतील. तसेच पैसे खर्च करणाऱ्या व्यक्तीची शिल्लकमधून कापली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here