Water in Sangli Jath 40 villages | काही दिवसांपूर्वीच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीच्या जत तालुक्यातील ४० गावांचा कर्नाटकात सामील होण्याच्या ठरावाचे स्वागत केले होते. आम्ही या प्रस्तावाचा गांभीर्याने विचार करू, असे बोम्मई यांनी म्हटले होते. यावरुन राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय लढाई सुरु झाली होती. अशातच आता या गावांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला आहे.

हायलाइट्स:
- टेंडर २० जानेवारी ऐवजी २३ डिसेंबरच्या आत काढावे
- अन्यथा २४ डिसेंबरला पुढील निर्णय घेऊ
- शिंदे-फडणवीस सरकारची डोकेदुखी वाढली
गेल्याच महिन्यात या गावांकडून राज्य सरकारला इशारा देण्यात आला होता. मुख्यमंत्री कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी जत तालुक्यातले ४२ गावे कर्नाटकमध्ये येणार असल्याचं विधान केल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली. त्यानंतर स्थानिक नेत्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सर्वांनी जत तालुक्यातील कोणतीच गावा कर्नाटकात जाणार नसल्याचा स्पष्ट केले होते. मात्र, प्रत्यक्षामध्ये ४२ गावातल्या पाण्यासाठी संघर्ष करणाऱ्या पाणी संघर्ष कृती समितीने वेगळी आणि आक्रमक भूमिका घेतली होती.
देवेंद्र फडणवीसांचा दावा, एकही गाव कर्नाटकात जाणार नाही
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सांगलीतील ४० गावं आमच्या राज्यात येण्यास इच्छूक असल्याचे सांगितल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगलीतील ४० गावांसंदर्भात केलेला दावा फसवा असून महाराष्ट्रातील एकही गाव कर्नाटकात जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले होते. जत तालुक्यातील ४० दुष्काळी गावांनी २०१२ साली कर्नाटकमध्ये सामीर होण्याचा ठराव मंजूर केला होता. हा ठराव आत्ताचा नाही, असे फडणवीस यांनी म्हटले होते. परंतु, या गावांमधील पाणी संघर्ष कृती समितीने आता नव्याने ठराव करून कर्नाटकमध्ये सामील होण्याची तयारी दाखवली आहे. त्यामुळे राज्य सरकारची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.