pune girl student, पुण्यातील अपघातात मुलगी गमावली, पण अश्रू ढाळण्यापेक्षा आई-वडिलांचं अनोखं काम; तुम्हीही कराल सलाम! – parents set up a new trust for social work after losing their college student daughter in an accident
पुणे : हाताशी आलेलं मुल जर अचानक सोडून गेले तर आई-वडिलांची काय अवस्था होते, याचा विचार न केलेला बरा. अनेकजण यातून खचून जातात. प्रसंगी यातून काही वाईट घटना देखील घडतात. मात्र पुण्यातील येवलेवाडी (कोंढवा) येथील संतोष धांडेकर यांचे मध्यम वर्गीय कुटुंब याला अपवाद ठरलं आहे. संतोष धांडेकर यांचा सुखी संसार सुरू होता. त्यांची मुलगी ऐश्वर्या ही घरात सर्वात मोठी. महाविद्यालयात शिक्षण घेत असताना ३ वर्षांपूर्वी ऐश्वर्याचा अपघात झाला. १० दिवस तिने मृत्यूशी झुंज दिली, मात्र त्यात तिचा मृत्यू झाला. त्यानंतर धांडेकर कुटुंब पूर्णतः कोसळून गेले. कारण स्वत:च्या मुलीचा मृत्यू त्यांनी डोळ्यांनी पाहिला होता. तिच्या आठवणीतून ते आजही सावरलेले नाहीत. ती कायम स्मरणात राहावी यासाठी सामजिक जाणीवेतून ऐश्वर्याच्या आईने ट्रस्ट सुरू करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर एक नवी ट्र्स्ट आता उभी राहिली आहे.
दरवर्षी ऐश्वर्याच्या पुण्यतिथीला तिच्या नावाने दिवा लावणे आणि अश्रू ढाळत बसण्यापेक्षा ती आणि तिचं नाव कायम आपल्यासोबत राहील, असं काही करण्याच्या इच्छाशक्तीतून ऐश्वर्या फाऊंडेशनची स्थापन झाली. या ट्रस्टच्या माध्यमातून आपल्या मुलीला आरोग्य सुविधा मिळवताना जो त्रास झाला, रक्त मिळवण्यासाठी ज्या खस्ता खाव्या लागल्या त्याची जाणीव ठेवत या ट्रस्टची निर्मिती करण्यात आली आहे. मध्यमवर्गीय कुटुंबाने आपल्या मुलीच्या स्मृती जपण्यासाठी अशा आगळ्या-वेगळ्या उपक्रमाची सुरुवात केल्याची बहुधा पहिलीच घटना असावी. महाराष्ट्र काय आहे दाखवून द्यायची वेळ आलीय, मविआ मुंबईत विराट मोर्चा काढणार: उद्धव ठाकरे
नेमकं काय घडलं होतं?
ऐश्वर्या संतोष धांडेकर या महाविद्यालयीन युवती नुकतीच दहावी संपली होती. करिअरची क्षीतिजे खुणावत असताना बिबवेवाडीतील व्हीआयटीच्या कोंढवा येथील महाविद्यालयात तिला प्रवेश घेऊन देण्यात आला. नित्यक्रम सुरू झाला. मात्र संपूर्ण धांडेकर कुटुंबाचा आयुष्यातलाच म्हटलं तरी चालेल, तो काळा दिवस आला. कॉलेजच्या आवारातच अपघात होऊन ऐश्वर्या गंभीर जखमी होऊन १० दिवस मृत्युशी झुंज देऊन अखेरीस २ डिसेंबर २०१९ रोजी तिने शेवटचा श्वास घेतला.
ऐश्वर्याच्या तिसरा स्मृतीदिनाचे औचित्य साधून आता तिच्या आई-वडिलांनी ट्रस्टची स्थापना केली असून पहिल्याच उपक्रमात रक्तदान शिबीर घेण्यात आले. यात जवळपास ४० हून अधिक जणांनी रक्तदान केलं आहे. मुलीच्या निधनाच्या धक्क्यातून आई-वडील अजूनही सावरलेले नाहीत. हाताशी आलेली पोरगी अशी आपल्यातून अचानक निघून जाणे हे विश्वास न बसणारे होते. पण तिच्या आठवणीत किती दिवस रडणार, किती दिवस त्रास करून घेणार याची जाणीव ठेवत त्यांनी या ट्रस्टची स्थापना केली आहे.