अहमदनगर : महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या आदेशानुसार राज्यात अवैध वाळू आणि अन्य गौण खनिज व्यवसायांवर कारवाई सुरू आहे. संगमनेर तालुक्यातही अशी कारवाई करण्यात आली. त्यावरून माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) आणि विखे पाटील यांच्यातील संघर्ष पेटला आहे. थोरात यांनी विखे यांच्या निर्णयावर टीका करताना ही दडपशाही असल्याचे व यामुळे विकास कामे ठप्प झाल्याचा आरोप केला होता. त्याला आता विखे पाटील यांनी उत्तर दिले आहे.

विखे पाटील म्हणाले, ‘अवैध धंद्यांविरोधात कारवाई व्‍हावी ही सामान्‍य माणसाचीच इच्‍छा होती. अवैध गौण खनीज आणि बेकायदेशीर वाळू उत्खननाबाबत सरकारने सुरु केलेल्‍या करवाईमुळे या सर्व बेकायदेशीर व्‍यवसायाला मोठा लगाम बसणार आहे. शासनाचे दायित्‍व बुडवून सुरू असलेला हा व्‍यवसाय आम्‍ही उघड्या डोळ्यांनी पाहायचा का? राज्‍यात या अवैध उत्‍खननाविरोधात कारवाई सुरुच राहील.’

विखे पाटील-थोरातांमधील संघर्ष पुन्हा पेटला; बाळासाहेब थोरात संतापले, म्हणाले…
‘अवैध गौण खनिज उत्‍खनन आणि वाळू माफियांवर संपूर्ण राज्‍यात कारवाई सुरु आहे. त्‍याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. ही कारवाई कोणा एका व्‍यक्ति आणि पक्षाविरोधात नाही. परंतू त्‍यांना वाईट वाटणे स्‍वभाविक आहे. आजपर्यंत राजकीय दबावापोटी कारवाया होत नव्‍हत्‍या. प्रशासनाने सुध्दा या अवैध धंद्याकडे डोळेझाक केली होती. प्रशासन सर्व गोष्‍टी सहन करीत होते. सरकारचे अब्‍जावधी रुपयांचे दायित्‍व बुडविले जात होते. महसूल खात्‍यातील अनेक आधिकाऱ्यांवर या माफियांकडून हल्‍ले झाले. त्‍यांना जीवे मारण्‍याचे प्रकार घडले. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्‍य सरकारने कठोर पावले उचलली आहेत. या सर्व बेकायदेशीर उत्‍खननाविरोधात सरकारची कारवाई सुरुच राहील,’ असेही विखे पाटील म्हणाले.

सत्तेत असताना शांत बसणाऱ्यांना आता कंठ कसा फुटला?; सीमाप्रश्नावरून भाजपचा ठाकरेंना सवाल
थोरात यांच्या आरोपांना उत्तर देताना विखे पाटील म्हणाले, ‘सरकारने सुरु केलेल्‍या कारवाईच्‍या विरोधात अनेकजण आता पत्रकबाजी आणि आंदोलनाचा स्‍टंट करीत आहेत. ते नेमके कोणाचे समर्थन करीत आहेत याचा तरी खुलासा त्‍यांनी करावा. अवैध उत्‍खनन करणाऱ्यांची भूमिका तुम्‍हाला मान्‍य आहे का? सरकारने सुरु केलेल्‍या कारवाईचे या सर्वांनी खरेतर समर्थन केले पाहिजे.

‘गौण खनिजाच्‍या कारणामुळे एकही सरकारी काम बंद पडणार नाही. निळवंडे कालव्‍यांच्‍या कामासाठी गौण खनिज उपलब्‍ध करुन देण्‍याबाबत सर्व सूचना व आदेश प्रशासनाने निर्गमित केले आहेत. गौण खनीज उपलब्‍धतेबाबत सर्व आधिकार प्रांताधिकाऱ्यांना देण्‍यात आले असून राज्‍यात गौण खनिज आणि वाळू संदर्भात सरकार लवकरच धोरण आणून या सर्व व्‍यवसायामध्‍ये पारदर्शकपणा कसा येईल असा प्रयत्‍न करीत आहोत,’ असेही विखे पाटील यांनी सांगितले.

कुठे आहे सरकार, कुठे आहेत मंत्री?; मुंबईतील प्रदूषित हवेच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा निशाणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here