मुंबई: ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना धमकीचे फोन आले आहेत. काल दिवसभरात राऊत यांना धमकीचे दोन फोन आले. उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाई यांच्या पत्रकार परिषदेनंतर राऊतांना धमकीचे फोन आले. सीमाप्रश्न पेटला असताना राऊत यांनी काल शिंदे सरकारवर जोरदार टीका केली. बेळगावमध्ये जाणारच. कन्नडिगांना राज्य सरकारनं उत्तर द्यावं, असं राऊत म्हणाले होते. यानंतर कन्नडिगांकडून राऊत यांना प्रत्युत्तर देण्यात आलं. कर्नाटकात येऊन दाखवा, असा धमकीवजा इशारा राऊतांना देण्यात आला.

राज्य सरकारमधील मंत्री कर्नाटकात जाणार होते. मात्र त्यांनी दौरे रद्द केले. त्यावरून राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. यानंतर उत्पादन शुल्क मंत्री शंभुराज देसाईंची पत्रकार परिषद झाली. राऊत साडेतीन महिन्यांनंतर तुरुंगाबाहेर आले आहेत. ते जामिनीवर आहेत. निर्दोष सुटलेले नाहीत. राऊत यांनी तोंडाला आवर घालावा. अन्यथा त्यांना पुन्हा आत जावं लागेल, असा इशारा देसाईंनी राऊत यांना दिला. देसाईंच्या पत्रकार परिषदेनंतर राऊत यांना धमकीचे दोन फोन आले. राऊत यांना फोनवर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
हिमाचल प्रदेशात भाजप-काँग्रेसमध्ये ‘टाय’? सत्तास्थापनेसाठी महाराष्ट्रातील ‘या’ नेत्याला शिमल्यात पाठवलं
संजय राऊत वरिष्ठ नेते आहेत. त्यांनी बोलताना काळजी घ्यायला हवी. त्यांना आलेला फोन खरा होता की खोटा याचा तपास केला जाईल. त्यांच्या जीवाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी राज्य सरकार घेईल, असं भाजपचे आमदार प्रसाद लाड म्हणाले. राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना राऊत यांना वाय दर्जाची सुरक्षा होती. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर पत्रा चाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं त्यांना अटक केली. जामिनीवर बाहेर आल्यानंतर राऊत यांना सुरक्षा प्रदान करण्यात आलेली नाही.
अमोल कोल्हेंचं काय होणार? शिरूरसाठी पार्थ पवारांचे नाव चर्चेत, पूर्वा वळसे पाटीलही तयारीत?
माझ्या जीवाचं बरंवाईट झाल्यास त्याची जबाबदारी राज्य सरकारची असेल, असं राऊत म्हणाले आहेत. राऊत यांची सुरक्षा काढण्यात आली. त्यामागे सरकारचा हात नाही. पोलीस यंत्रणेची समिती याबद्दलचे निर्णय घेते. त्यात आयपीएस अधिकारी, गृह सचिव, डीजींचा समावेश असतो. सुरक्षासंबंधीचे अहवाल पाहून त्यांच्याकडून कोणाला सुरक्षा पुरवायची, याबद्दलचा निर्णय होत असतो, असं लाड म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here