दिल्लीत करोनाच्या चाचण्यांवर सुरुवातीपासूनच गंभीरपणे भर देण्यात आला. दिल्लीत आताही दररोज २० हजारांहून अधिक चाचण्या करण्यात येत आहेत. या मुळे देखील पुढे होणार संसर्ग रोखण्यातम मोठी मदत मिळाली आहे. या पूर्वी दिल्लीत दररोज ३ ते ४ हजार रुग्णांची दररोज नवी भर पडत होती. तसेच दिल्लीत दररोज शंभराहून अधिक रुग्णांचे मृत्यू देखील होत होते. दिल्लीत क्वारंटीनबाबत विशेष मोहीम राबवली गेली. त्याच प्रमाणे वैद्यकीय सेवा योग्य त्या प्रमाणात आणि वेळेवर उपलब्ध व्हावी यासाठी देखील दिल्ली सरकारने कार्यक्रम आखला होता. याचा या यशात मोठा वाटा असल्याचे मानले जात आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांच्या नियोजनाबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांनी विशेष लक्ष पुरवल्यामुळे देखील दिल्लीत चांगले परिणाम पाहायला मिळत असल्याचे बोलले जात आहे.
वाचा:
आजही दिल्लीत दररोज करोनाचे एक हजाराहून अधिक रुग्ण आढळत आहेत. मृतांची संख्याही एक तृतियांशवर आली आहे. दिल्लीत आज एकूण ३५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत आतापर्यंत एकूण १ लाख २३ हजार ७४७ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या रुग्णांपैकी एकूण १ लाख ४ हजार ९१८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. दिल्लीत रोज सरासरी २००० रुग्ण बरे होत आहेत. तसेच दिल्लीत सक्रिय रुग्णांची संख्या ५८३३ इतकी असून दिल्लीत २५,४८३ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
वाचा:
दिल्ली सरकारने कंटेन्मेंट झोनवर विशेष लक्ष दिले असून दिल्लीत आजच्या घडीला ६९६ इतके कंटेन्मेंट झोन आहेत. येथे नियमांचे काटेकोरपणे पालन केले जाते.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times