गेल्या १० दिवसांपासून राजस्थानच्या गहलोत सरकारवर संकटांचे ढग मंगळवारी हायकोर्टात प्रकरण गेल्यानंतर काहीसे दूर झाले आहेत. मात्र, असे असले तरी देखील सचिन पायलट गटाला पूर्णपणे दिलासा मिळालेला नाही. आता या प्रकरणावर २४ जुलैला निकाल येणार आहे. ( reserves judgement till july 24)
पायलट गटाने मांडली आपली बाजू
विधानसभा अध्यक्ष डॉ. सी. पी. जोशी यांनी पायलट गटाच्या सर्व आमदारांचे विधानसभा सदस्यत्व रद्द करण्याबाबत गटाला नोटीस बजावली आहे. त्या विरोधात पायलट गटाने हायकोर्टाचे दरवाजे ठोठावले आहेत. शुक्रवारी पायलट गटातर्फे वकील हरीश साळवे यांनी लंडनहून ऑनलाइन कोर्टात आपले म्हणणे मांडले. सुमारे दीड तास चाललेल्या या युक्तीवादादरम्यान साळवे यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हवाला देत सचिन पायलट आणि इतर १८ आमदारांना बजावलेली नोटीस फेटाळून लावण्याची मागणी कोर्टाकडे केली. त्यानंतर गटाकडून मुकुल रोहतगी यांनी कोर्टापुढे आपली बाजू मांडली.
वाचा:
गहलोत-पायलट गटातील आमदारांची नाकाबंदी
राजस्थानमधील गहलोत सरकारवर आलेल्या राजकीय संकटाचा आज मंगळवारी ११ वा दिवस आहे. सरकारविरुध्द बंडखोरी करणारा सचिन पायलटचा गट बंडखोरीनंतर राजस्थानच्या बाहेर एका हॉटेलात कैद आहेत. तर, गहलोत गटाचे आमदार देखील जयपूरमधील एका हॉटेलमध्ये आहेत. गेल्या सात दिवसांपासून हे आमदारांवर हॉटेलात आहेत. पायलट आणि गहलोत या दोन्ही गटातील आमदार आपापल्या ठिकाणी कैद असतानाच हे प्रकरण न्यायालयात पोहोचले. तेव्हा पासून सर्वांचे लक्ष आता हायकोर्टाच्या निर्णयाकडे लागले आहे.
वाचा:
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times