‘खासदार, आमदार, जिल्हापरिषद सदस्य अशी नेतेमंडळी किंवा काही प्रशासकीय अधिकारी सहजपणे चौथऱ्यापर्यंत जातात. त्याचवेळी शिवभक्तसुद्धा शेकडो किलोमीटरचा प्रवास करुन रायगडावर येतात. त्यांनासुद्धा जवळून दर्शन घेता आलं पाहिजे.’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाचाः
‘रायगडावरील महत्त्वाचे व पवित्र ठिकाण म्हणजे राजसदर. समतेचं, ममतेचं आणि अन्यायाविरुद्ध न्याय मागण्याचं हे ठिकाण. अश्या पवित्र ठिकाणाचे धुलीकरण आपल्या मस्तकी लावण्यासाठी शेकडो किलोमीटर दुरवरून गडावर दररोज येत असतात. महाराजांना अभिवादन करावे, जवळून दर्शन घ्यावे ही त्यांची माफक अपेक्षा असते. पंरतु, मागच्या काही वर्षांपासून राजसदरेवर शिवभक्तांना जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे त्यामुळं शिवभक्त नाराज होताना दिसत आहेत.’ असं त्यांनी म्हटलं आहे.
‘राजसदरेवरील कोणत्याही भागाला शिवभक्त नुकसान पोहोचवणार नाहीत, महाराजांच्या मूर्तीला, सिंहासन चौथऱ्याला प्राणपणानं जपतील,’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. तसंच, ‘राजसदरेवर जी काही सुरक्षा व्यवस्था असेल ती पुतळ्या शेजारी असेल त्यामुळं शिवभक्तांना लांबून पाठवणं योग्य नाही. लवकरच, सर्व शिवभक्तांना राजसदरेवर जाऊन महाराजांचे दर्शन घेता येईल,’ अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, तब्बल दीडशे वर्षांनंतर रायगडावरील हत्ती तलाव पूर्णक्षमतेनं भरला आहे. गडावर असलेल्या तलाव व टाक्यामध्ये वर्षानुवर्षे गाळ साचल्यामुळे त्यांची जलधारण क्षमता खुप कमी झाली होती. तसेच तलावांना ठिकठिकाणी गळती लागल्यामुळे साठलेल्या पाण्याचा मोठ्याप्रमाणात अपव्यय होत होता. त्यामूळे प्राधिकरणाच्या स्थापनेनंतर सर्वप्रथम गडावरील महत्त्वाच्या तलावातील, टाक्यातील गाळ काढण्याचे काम हाती घेण्यात आले होते. खासदार संभाजीराजेंनी नुकतीच या तलावाला भेट दिली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times