IND vs AUS : भारताने दमदार गोलंदाजीची सुरुवात करत ऑस्ट्रेलियाची २ बाद ५ अशी अवस्था केली होती. पण त्यानंतर एलिस पेरीने अर्धशतक झळकावले व ऑस्ट्रेलियाला १७२ धावा करता आल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना शेफालीने अर्धशतक झळकावले खरे, पण तरीही भारताला विजय मिळवता आला नाही व भारताला आधाडी मिळवता आली नाही.

भारताने या सामन्यात प्रथम गोलंदाजी करताना एकच धडाका उडवून दिला. कारण पहिल्याच षटकात भारताने ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का देत त्यांची १ बाद २ अशी अवस्था केली. त्यानंतर दुसऱ्या षटकातही भारताने ऑस्ट्रेलियाला अजून एक धक्का दिला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या षटकात २ बाद ५ अशी स्थिती केली होती. पण त्यानंतर ऑस्ट्रेलियातची एलिस पेरी खेळायला आली आणि तिने धडाकेबाज फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाचा डाव सावरल्याचे पाहायला मिळाले. कारण पेरीने यावेळी फक्त ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येला चांगला आकार दिला आणि त्याचबरोबर संघाची धावगतीही वाढवली. पेरीने यावेळी ४७ चेंडूंत ९ चौकार आणि तीन षटकारांच्या जोरावर ७५ धावांची झुंजार खेळी साकारली. पेरीच्या या ७५ धावांच्या खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियाला २० षटकांत ८ बाद १७२ अशी धावसंख्या उभारता आली. पेरीला यावेळी ग्रेस हॅरी (४१ धावा) आणि ब्रेथ मुनी (३० धावा) यांनी चांगली साथ दिली. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाला या सामन्यात धावांचा डोंगर उभारता आला.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.