मुंबई : जुईनगर येथील सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने आज सकाळी हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. बिघाडाची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाकडून तात्काळ ही यंत्रणा दुरुस्त करण्यात आली. मात्र लोकल वाहतूक उशिराने सुरू असल्याने सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेल्या मुंबईकरांना मोठ्या मनस्तापाचा सामना करावा लागला आहे.
दरम्यान, या बिघाडाचा परिणाम मध्य मार्गावरील वाहतुकीवरही झाला. मध्य मार्गावरील लोकल गाड्याही १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत. काही वेळानंतर वाहतूक पूर्वपदावर येईल, असा दावा रेल्वेकडून करण्यात आला आहे.