Maharashtra Farmer News Update: अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना (Maharashtra Farmer News) शिंदे-फडणवीस सरकारनं (Shinde Fadnavis Govt) पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान ( heavy rains) झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर दुपटीने वाढ करण्यात आली आहे. महसूल व वन विभागानं हा निर्णय जाहीर केला आहे.  जिरायत पिकाच्या नुकसानीसाठी 6 हजार 800 रुपयांऐवजी आता 13 हजार 600 रुपये मिळणार आहेत तर बागायत पिकाच्या नुकसानीसाठी 13  हजार 500 ऐवजी आता 27  हजार रुपये मिळणार आहेत. 

बहुवार्षिक पिकाच्या नुकसानीसाठी 18 हजार ऐवजी आता मिळणार 36 हजार रुपये मिळणार आहेत. सरकारनं नुकसानीची मर्यादाही वाढवली आहे. दोन हेक्टरऐवजी तीन हेक्टरपर्यंत मदत मिळणार असल्याचं या शासन निर्णयात म्हटलं आहे. 

News Reels

ही बातमी देखील वाचा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here