Authored by टीम मटा ऑनलाइन | Edited by प्रशांत पाटील | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Dec 2022, 10:24 am
Ahmednagar News : एकीकडे पंतप्रधानांनी समृद्धी महामार्गाचे उद्घाटन केले. मात्र, शेवगाव तालुक्यातील सालवडगावपासून अगदी २ किलोमीटरवर असलेल्या हनुमानवस्ती ही ३५० लोकवस्ती असलेलं छोटेखाणी गाव आहे.

हायलाइट्स:
- माजी सैनिकाने मुख्यमंत्र्यांकडे मागितले हेलिकॉप्टरसाठी अर्थ साहाय्य
- अहमदनगरमधील शेवगाव तालुक्यातील हनुमानवस्ती या गावाची कहाणी
शेवगाव तालुक्यातील सालवडगावपासून २ किलोमीटर असलेल्या या हनुमानवस्ती या विखुरलेल्या वस्तीत मोजून ३५० लोक राहतात. गावकऱ्यांसाठी जुन्या ओढ्यातून रस्ता आहे त्यावरही बंधारे बांधण्यात आले आहेत. त्यामुळे रस्त्याचं काम रखडलं. तत्कालीन तहसीलदार पागीरे यांनी रस्त्यांची पाहणी केली कामही सुरू होणार होते. मात्र, पावसामुळे कामाला सुरुवात होऊ शकली नाही आणि ओढ्यावरही अतिक्रमण झालं. वर्षानुवर्षे रस्त्याची अशीच परिस्थिती असल्याने सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाने थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून हेलिकॉप्टरसाठी कर्ज मिळावे, अशी मागणी केलीये.
रस्त्याच्या या दुरावस्थेमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. पावसाळ्यात तर आठवड्यातून एकदा दोनदाच शाळेत जाता येत. त्यामुळे एकीकडे समृद्धी महामार्गासारखा रस्ता होत असताना दुसरीकडे केवळ २ किलोमीटरचा रस्ता होत नसेल तर ते दुर्दैव असल्याचे विद्यार्थी सांगतात, असं माजी सैनिक दत्तू भापकर यांनी यावेळी सांगितलं.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.