वाचा:
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिरज तालुक्यातील समडोळी येथे राहणाऱ्या भीमराव कांबळे यांच्याशी इचलकरंजी येथील साक्षी यांचा दोन वर्षांपूर्वी विवाह झाला होता. गेल्या काही महिन्यांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. किरकोळ कारणांवरूनही दोघांमध्ये वारंवार खटके उडत होते. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाल्यानंतर २५ फेब्रुवारी २०२० ते २७ फेब्रुवारी २०२० या दरम्यान साक्षी यांनी घरामध्ये कोणी नसल्याचे पाहून भीमराव यांनी घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवलेले ३० हजार रुपये घेऊन माहेरी पोबारा केला. घरातील पैसे घेऊन पत्नी माहेरी गेल्याचे लक्षात येताच भीमराव यांनी तिची समजूत घालून पुन्हा माघारी बोलवण्याचा प्रयत्न केला.
वाचा:
मात्र, गेल्या साडेचार महिन्यांपासून पत्नीने पैसे दिले नाहीत आणि ती परतही आली नाही. अखेर भीमराव यांनी याबाबत मंगळवारी सांगली ग्रामीण ठाण्यात पत्नीच्या विरोधात फिर्याद दाखल केली. भीमराव कांबळे यांच्या फिर्यादीवरून पत्नी साक्षी भीमराव कांबळे यांच्या विरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times