पुणे : पुण्यात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. वाहन चालवताना मोबाईलचा वापर केल्यामुळे यातील बहुतांश अपघात घडत असतात. अशीच एक घटना पिंपरी चिंचवड परिसरातून समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील पिंपळे गुरव भागात दुचाकीस्वाराला फोनवर बोलणं जीवावर बेतलं आहे. शैलेश गजानन जगताप (वय- २९) असं अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचं नाव आहे.
शैलेश यांनी गाडीवर असताना हेल्मेट वापरले असते तर कदाचित त्यांचा जीव वाचला असता. शैलेश जगताप यांच्या अचानक जाण्याने त्याच्या कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
दरम्यान, दुचाकी चालवताना प्रत्येकाने हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. तसंच मोबाईल बोलणं टाळावं, असं आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात येत आहे.