कोल्हापूर : आजरा तालुक्यातील उत्तूर-मुमेवाडी मार्गावर पहाटे ४ वाजताच्या सुमारास पिकअप आणि एसटी बसला अपघात झाला आहे. पिकअप चालकाचा ताबा सुटल्याने वाहन रस्त्यावर उलटले. याचवेळी समोरून गारगोटी आगाराची बस उत्तूरकडे येत होती. पिकअप एसटीला धडकण्याची भीती निर्माण झाल्याने चालकाने बस बाजूला घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी ही बस झाडाला जाऊन धडकली. दोन्ही गाड्या विरुद्ध दिशेला धडकल्यानंतर पिकअपमधील चालकाचा जागीच मृत्यू झाला असून बसमधील १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या अपघातानंतर बसचालक माणिक दतात्रय राजिगरे यांनी आजरा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा पिकअप गाडी (क्र. एमएच ११ सीएच २४६१) ही भरधाव वेगाने उत्तूर येथून मुमेवाडीकडे जात असताना बामणे यांच्या वसाहतीजवळ आली असता रस्त्याच्या मैलाच्या दगडाला धडकल्याने रस्त्यावर वेडीवाकडी वळणे घेऊ लागली. दरम्यान त्याच वेळी गडहिंग्लज येथून गारगोटी आगाराची एसटी बस (क्र. (एमएच १४ बीटी ०३२३)) उत्तूरकडे जात होती.

सायकलपोलो स्पर्धेसाठी नागपुरात आलेल्या मुलीचा मृत्यू; डॉक्टरांनी इंजेक्शन देताच…; असंवेनदनशीलतेचा कळस

दरम्यान, सदर पिकअप वाहन वेडी-वाकडी वळणे घेत असल्याचे पाहिल्यामुळे चालकाने एसटी बस अचानक डाव्या बाजूला घेतली. मात्र याच वेळी ही बस झाडावर धडकली. तर महिंद्रा पिकअप रस्त्याच्या डाव्या बाजूस उलटली. यावेळी पिकअप चालक बाहेर फेकला गेला आणि गंभीर जखमी झाला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.

दुसरीकडे, बसमधील १७ प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. बसमध्ये एकूण ७० प्रवासी होते. जखमींना उत्तूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आलं आहे. या अपघातामुळे दोन्ही बाजूच्या रस्त्यावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here