कोकणातील रायगड जिल्ह्यामधील पेण तालुक्यात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. पत्नीची आत्महत्या असल्याचा बनाव रचून दिशाभूल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पती सतीश म्हात्रेचा खरा चेहरा समोर आला आहे. लहान मुलाला थंड पाण्याने आंघोळ घातल्याचा राग मनात धरून पतीने पत्नीच्या डोक्यात वार करून तिला ठार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे.

देवर्षी नगर डोलवी येथे एका २५ वर्षीय महिलेने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना १६ डिसेंबर रोजी सकाळी घडली होती. या प्रकरणी वडखळ पोलीस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. पण आता या सगळ्या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. या प्रकरणाच्या तपासात महिलेची आत्महत्या नसून खून असल्याचं उघडकीस आलं.
मुलाला थंड पाण्याने आंघोळ घातली म्हणून रागाच्या भरात पतीने आपल्या पत्नीचा खून केला. मृत महिलेने तिच्या लहान मुलाला थंड पाण्याने आंघोळ घातली. या गोष्टीचा मनात राग धरुन पतीने तिच्या डोक्यावर जड वस्तू आपटून तिचा खून केला. खून केल्याचा आरोप स्वत: वर येऊ नये म्हणून भावाच्या मदतीने तिला ओढणीच्या साहाय्याने गळफास लावत तिच्या आत्महत्येचा बनाव रचला. ही बाब पोलीस तपासात उघड झाल्यानंतर या प्रकरणी दोघांविरोधात भादंवि कलम ३०२, २०१, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Your article made me suddenly realize that I am writing a thesis on gate.io. After reading your article, I have a different way of thinking, thank you. However, I still have some doubts, can you help me? Thanks.