Shiv sena News : नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या आठवड्यात दिशा सालियन मृत्यू प्रकरण गाजले. या प्रकरणावरून सत्ताधाऱ्यांनी आदित्य ठाकरेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे स्वतः नागपुरात दाखल झाले आहेत. यामुळे नागपुरात हिवाळी अधिवेशनात काय होणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. दुसरीकडे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

राज्यात सरकार नसून ठग-पेंढाऱ्या टोळीचं राज्य, उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीसांवर बरसले
राज्यात सरकार नसून ठग-पेंढाऱ्या टोळीचं राज्य, उद्धव ठाकरे शिंदे-फडणवीसांवर बरसले
मुंबई : दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी चौकशी होणार आहे. या प्रकरणावरून शिवसेना नेते आदित्य ठाकरेंवर सत्ताधारी शिंदे गट आणि भाजपकडून आरोप होत आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी तर आदित्य ठाकरे हे तुरुंगात जाणार, असा दावा केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी रविवारी मोठं वक्तव्य केलं आहे. नागपुरात बॉम्ब फोडणार, असं राऊत म्हणाले. यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यासह शिवसेनेचे मातब्बर नेते नागपुरात दाखल झाले आहेत. आता नागपुरात उद्धव ठाकरे काय बॉम्ब फोडणार याकडे लक्ष लागलं आहे. पण त्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून शिंदे गट आणि भाजप सरकार खरमरीत टीका केली आहे. राज्यात सरकार नसून ठग-पेंढाऱ्या टोळीचं राज्य आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न सोडून दुसऱ्या मुद्द्यांवर राजकारण सुरू आहे. कारण राज्यात सरकार नसून एका बेकायदेशीर टोळीचे राज्य सुरू आहे. भारतात अठराव्या-एकोणिसाव्या शतकात रयतेची लुटमार आणि वाटमार करणाऱ्या संघटित टोळ्या उदयास आल्या होत्या. त्यात पेंढाऱ्यांची सशस्त्र टोळी राजाश्रयाने उदयास आली. तर दुसरी टोळी ठगांची होती. ठगांची टोळी धार्मिक हिंसाचार घडवून आपला मतलब साधणारी भूमिगत संघटना होती. महाराष्ट्रात सध्या अशा ठग आणि पेंढाऱ्यांचीच चलती आहे. राज्य त्यांच्या हुकमाने चालते, अशी बोचरी टीका उद्धव ठाकरे यांनी शिंदे-भाजप सरकारवर केली आहे.

हे खोके सरकार आहे. त्यांनी आज होलसेलमध्ये क्लीन चिट दिलीय. शंभर उंदरांचा फडशा पाडून काशीला पोहोचलेल्या ४० फुटीर बोक्यांचा आनंद औटघटकेचा असणार आहे. नागपूरच्या थंडीत या बोक्यांचे आणि त्यांच्या खोके सरकारचे मेंदू गोठून गेले. भाजपला हवे ते घडले. अधिवेशनात चिखलफेकीस उत्तेजन देऊन छत्रपती शिवरायांच्या अपमानाचा मुद्दा मागे ढकलला. राज्यात ठग-पेंढाऱ्यांचेच राज्य आले म्हटल्यावर दुसरे काय व्हायचे? असा सवाल करत उद्धव ठाकरे यांनी खरमरीत टीका केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here