Mansi Kshirsagar | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 27 Dec 2022, 6:40 am
सर्वसामान्यांमध्ये आता उत्तम सामूहिक प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे करोना प्रतिबंधात्मक उपायासंबधी नियम का पाळाव्याते, काळजी का घ्यावी, असा प्रश्न विचारला जातो. त्यावर तज्ज्ञांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे, असे मत व्यक्त केले आहे.

रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे मोफत मिळूनही लसीची तिसरी मात्रा घेण्यात आलेली नाही त्यामुळे हा साठा पडून राहिला किंवा फुकट गेला. आता फार मोजक्या ठिकाणी मात्रा उपलब्ध आहेत. एक्सबीबी या ओमायक्रॉन विषाणूच्या उत्परावर्तित स्वरूपाच्या संसर्गाने बाधित झालेल्या रुग्णांचे ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांमध्ये नमुने आढळले होते. मात्र त्यानंतरही राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढला नाही त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. या विषाणूची संसर्गक्षमता किती आहे यावर फैलावाचा वेग ठरेल. ही संसर्गक्षमता अधिक असल्यास लागण होण्याची शक्यताही अधिक असेल त्यामुळे करोना प्रतिबंधक वर्तन प्रत्येकाने पाळायला असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
I have read your article carefully and I agree with you very much. This has provided a great help for my thesis writing, and I will seriously improve it. However, I don’t know much about a certain place. Can you help me?