या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी शेखर शिंदे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रुपेश जाधव, गणेश येमुल, कृष्णा बिटलिंग, कृष्णा गाजुल, निरज कटकम आणि इतर दोघांवर अशा सात जणांच्या विरोधात आर्म अॅक्टनुसार हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून ४ आरोपींना ताब्यात घेण्यात आलं आहे.
साहेब, तुमचे मुख्यमंत्री आहेत तुम्ही सांगा त्यांना… अन् राज ठाकरेंनी कपाळालाच हात लावला
काय आहे अक्षय वल्लाळ हत्या प्रकरण?
नाना पेठेतील नवा वाडा भागात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून २७ जुलै २०२२ रोजी रात्री एक वाजेच्या सुमारास अक्षय वल्लाळ याचा महेश बुरा आणि किशोर शिंदे या दोघांनी धारधार शस्त्राने वार करून डोक्यात सिमेंट काँक्रिटचा दगड घालून हत्या केली होती. याबाबत अतुल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर समर्थ पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. वल्लाळ खून प्रकरणातील आरोपी किशोर शिंदे हा शेखर शिंदे याचा मोठा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर शिंदे हा दुचाकीवरून फोनवर बोलत मंडईतील गजबजलेल्या रामेश्वर चौकातून निघाला होता. त्यावेळी आरोपी रुपेश जाधव, गणेश येमुल, कृष्णा बिटलिंग, कृष्णा गाजुल, निरज कटकम आणि इतर दोघे तेथे आले. त्यातील एकाने शिंदे याच्या डोक्याला पिस्तूल लावून गोळी झाडली. सुदैवाने ती गोळी चुकली. तर इतर आरोपींनी कोयत्याने शेखरच्या डोक्यात आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले.
दरम्यान, शेखर हा जीव वाचवून तेथून पळून जात असताना, आरोपींनी त्याचा पाठलाग करून पकडले. “तुझ्या भावाने आमचा मित्र अक्षय वल्लाळची हत्या केली. त्याचा बदला म्हणून आज तुझी हत्या करणार आहे. तुला जीवंत सोडणार नाही.” असे बोलून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केलं आहे. शेखर याच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शेखरला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपी फरार असून गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत.