मुंबई: झुबेर अन्सारी या स्थानिक रहिवाशाने आरे कॉलनीतील वर्दळ नसलेल्या युनिट-२०मध्ये पाच दगडी शिल्पे आणि शिवलिंगाचा काही भाग शोधून काढला आहे. या शोधामुळे परिसरात खळबळ उडाली आहे कारण स्थानिक कार्यकर्ते dark grey and black stone शिल्पांचे कार्बन डेडिंग करण्याचा प्रयत्न करत आहेत.

या संदर्भात टाईम्स ऑफ इंडियाने भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) च्या मुंबई मंडळ कार्यालयाशी संपर्क साधला तेव्हा एका अधिकाऱ्याने सांगितले की, आमचे मुंबई मंडळ प्रमुख डॉ. राजेंद्र यादव सध्या उपलब्ध नाहीत. पण शिल्पांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी एएसआय टीम आरेला भेट देऊ शकते.

वाचा- IND vs SL: हे तर ठरलेच होते…एकाचे आंतरराष्ट्रीय संपल्यात जमा तर दुसऱ्याला

अन्सारी म्हणाले की, त्यांनी यापूर्वी सीप्झ सीमेच्या अगदी जवळ असलेल्या जागेवर माती आणि उंच गवताने झाकलेले दगड पाहिले होते. अलीकडे, कुतूहलामुळे, मी गवत कापले आणि दगड स्वच्छ केले तेव्हा ते शिव, दुर्गा, हनुमान आणि शिवलिंगाची शिल्पे असल्याचे कळाले. या भागातील काही जुन्या काळातील लोकांनी सांगितले की, मूर्ती सीप्झमधील त्यांच्या मूळ मंदिराच्या जागेवरून येथे हलवण्यात आल्या असतील.

sculptures

मला वाटते की ही शिल्पे किमान ५०० वर्षे जुनी आहेत, तरीही आम्ही त्यांच्या वयाची पुष्टी करण्यासाठी तज्ञांची वाट पाहत आहोत. दुर्गा मूर्तीचे जतन केले आहे. हे देखील शक्य आहे की हे आरे जंगलातील मंदिरातील असावे, असे अन्सारी म्हणाले.

वाचा- वर्ल्डकप जिंकण्याची स्वप्न पाहणाऱ्या भारतानं पाहा केलं तरी काय? विराटनंतर झाली बिकट…

सेव्ह आरे फॉरेस्ट चळवळीतील सक्रीय कार्यकर्ते आणि वनशक्ती एनजीओचे डी स्टॅलिन म्हणाले, आरे जंगल हे अवशेषांचा खजिना आहे. कारण ते कान्हेरी लेणी (संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील) आणि जोगेश्वरी लेणी या दोन्ही जवळ आहे. जोगेश्वरी देवीचे शिल्प, ज्याला योगेश्वरी देखील म्हणतात. त्यामुळे येथे अतिक्रमण, वृक्षतोड आणि आरे मेट्रो कारशेडचे अनावश्यक बांधकाम पाहून वाईट वाटते.

पोर्तुगीज जेसुइट्सने बांधलेले १६ व्या शतकातील जीर्ण चर्च (सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च)अजूनही सीप्झच्या आत आहे. भक्तांना या कोसळलेल्या चर्चला भेट देण्याची आणि वर्षातून एकदा प्रार्थना करण्याची परवानगी आहे, असेही डी स्टॅलिन यांनी सांगितले.

सुरक्षा कामगार सेनेचे अध्यक्ष इंतेखाब फारुकी म्हणाले, तज्ञांनी येथे प्राथमिक अभ्यास करणे आवश्यक आहे कारण मला खात्री आहे की हे क्षेत्र प्राचीन भारताच्या संदर्भात महत्त्वपूर्ण आहे. जवळील जोगेश्वरी लेणी इ.स. ५५० मध्ये बांधली गेली, असे म्हणतात. नॅटकनेक्ट फाऊंडेशनचे पर्यावरणतज्ज्ञ बी एन कुमार म्हणाले, एएसआयने येथे पूर्ण अभ्यास केला पाहिजे. या संदर्भात मी त्यांच्याशी पत्रव्यवहार करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here