उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यात झाशी-मिर्झापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात दोन मित्रांचा करूण अंत झाला. दोघे बँकेतून ड्युटी करून घरी परतत होते. त्यावेळी एका अनियंत्रित ट्रकनं दोघांना चिरडलं. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी दोघांना रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.

दोन तरुण मुलांच्या अकाली निधनामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृत शिवम दोन जुळ्या भावंडांत लहान होता. प्रदीर्घ आजारपणामुळे त्याच्या वडिलांचं निधन झालं आहे. आता शिवमच्या मृत्यूमुळे आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
काल रात्री पोलिसांनी दोन तरुणांना जिल्हा रुग्णालयात आणलं. तपासणी करून त्यांना मृत घोषित करण्यात आलं. दोन्ही मृतदेहांचं शवविच्छेदन अद्याप झालेलं नसल्याची माहिती डॉ. एस. के. मौर्य यांनी दिली. ट्रक आणि दुचाकीला रात्री अपघात झाला. त्यात दोन तरुणांचा मृत्यू झाला. मृतदेह ताब्यात घेऊन ते शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. पुढील कार्यवाही सुरू आहे, असं डीसीपी अंबुजा त्रिवेदी यांनी सांगितलं.
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Your article helped me a lot, is there any more related content? Thanks! https://www.binance.com/ph/register?ref=P9L9FQKY
I don’t think the title of your article matches the content lol. Just kidding, mainly because I had some doubts after reading the article. https://accounts.binance.com/pt-BR/register-person?ref=S5H7X3LP