कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरून सध्या राजकीय गदारोळ सुरू आहे. या मुद्द्यावरून भाजपने राज्यभरात रान पेटवल्यानंतर आज स्वराज्य संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली. ‘अजित पवारांनी केलेलं वक्तव्य चुकीचं आहे. त्यांनी कोणत्या आधारावर असं वक्तव्य केलं? संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक तर होतेच, पण धर्मरक्षकही होते. त्यामुळे राजकीय नेत्यांनी विकृत वक्तव्य करणं टाळावं,’ अशा शब्दांत संभाजीराजेंनी अजित पवारांचा समाचार घेतला आहे.

अजित पवारांवर टीका करताना संभाजीराजे पुढे म्हणाले की, ‘संभाजी महाराज हे धर्मरक्षक असल्याचे अनेक पुरावे आहेत. अजित पवारांनी कोणत्याही ऐतिहासिक गोष्टीवर बोलताना अभ्यास पूर्ण केल्याशिवाय प्रतिक्रिया देऊ नये. ते आता अर्धसत्य बोलले आहेत. संभाजी महाराज स्वराज्यरक्षक होते, हे अजित पवारांचं म्हणणं बरोबर आहे. मात्र ते धर्मवीर नव्हते, हे योग्य नाही.’

Shahajibapu Patil: काय डाएट, काय वर्कआऊट, शहाजीबापू एकदम ओके! आठवड्यात नऊ किलो वजन घटवलं

दरम्यान, संभाजीराजेंनी घेतेलल्या या भूमिकेवर आता राष्ट्रवादीकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान सभागृहात बोलताना अजित पवार यांनी म्हटलं होतं की, ‘आपण छत्रपती संभाजी महाराज यांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा करतो. मात्र, त्यांना काही लोक धर्मवीर म्हणत आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी कधीही धर्मावरुन राज्य केलं नाही,’ असं वक्तव्य अजित पवारांनी केले होते. या विधानावर आक्षेप घेत अजित पवारांनी धर्मवीर संभाजी महाराज यांचा अपमान केला असून त्यांना विरोधी पक्षनेतेपदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, असा हल्लाबोल भाजपकडून केला जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here