कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत आई आणि मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा त्यांना मिळावा, म्हणून जालन्यातील एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं. जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस या गावात हे आंदोलन करण्यात आलं. सुनील जाधव असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.
धक्कादायक,परवाना एका जागेचा, फटाके निर्मिती दुसरीकडे, बार्शीतील फटाका कारखाना बेकायदेशीर
जाधव यांच्या आई आणि मावशीला प्रत्येकी १ हेक्टर ३५ हजार जमीन मंजूर झालेली आहे. मात्र, असे असतानाही या जमिनीचा अजूनही ताबा मिळालेला नाही. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही त्यांना जमीन ताब्यात मिळत नसल्याने कंटाळलेल्या शेकऱ्याने अखेर स्वत:ला जमिनीत पुरून घेतलं आणि या अनोख्या आंदोलनाच्या माध्यामातून प्रशासन आणि शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.