जालना : आजपर्यंत तुम्ही शेतकरी बळी राजाला विविध प्रकारचे आंदोलन करताना पाहिले असेल. मात्र, जालन्यामध्ये एका शेतकऱ्याने अनोखे आंदोलन केले. आई, मावशीला जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वत:ला या शेतकऱ्याने जमिनीत पुरून घेत अनोखे आंदोलन केले. ही घटना जालना जिल्ह्यातील हलस येथील आहे. या अनोख्या आंदोलनाचा व्हिडिओही समोर आला आहे.

कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेअंतर्गत आई आणि मावशीला मिळालेल्या जमिनीचा ताबा त्यांना मिळावा, म्हणून जालन्यातील एका शेतकऱ्याने अनोख्या पद्धतीने आंदोलन करत स्वत:ला जमिनीत गाडून घेतलं. जालन्यातील मंठा तालुक्यातील हेलस या गावात हे आंदोलन करण्यात आलं. सुनील जाधव असं आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याचं नाव आहे.

धक्कादायक,परवाना एका जागेचा, फटाके निर्मिती दुसरीकडे, बार्शीतील फटाका कारखाना बेकायदेशीर

जाधव यांच्या आई आणि मावशीला प्रत्येकी १ हेक्टर ३५ हजार जमीन मंजूर झालेली आहे. मात्र, असे असतानाही या जमिनीचा अजूनही ताबा मिळालेला नाही. या संदर्भात वारंवार पाठपुरावा करुनही त्यांना जमीन ताब्यात मिळत नसल्याने कंटाळलेल्या शेकऱ्याने अखेर स्वत:ला जमिनीत पुरून घेतलं आणि या अनोख्या आंदोलनाच्या माध्यामातून प्रशासन आणि शासनाचा लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

कर्णधारानंतर भारताचा प्रशिक्षक बदलणार, BCCI चा प्लॅन रेडी, पाहा कोण असेल भारताचा नवा कोच

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here