वाचा:
राज्यसभेतील नवनिर्वाचित खासदारांनी काल सदस्यत्वाची शपथ घेतली. राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांनी ही शपथ दिली. महाराष्ट्रातून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, रिपब्लिकन नेते रामदास आठवले, प्रियांका चतुर्वेदी व उदयनराजे भोसले यांनी शपथ घेतली. उदयनराजे भोसले (Udayanaraje Bhosale) यांनी इंग्रजीत शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर त्यांनी ‘जय भवानी, जय शिवाजी’ अशी घोषणा दिली. उपराष्ट्रपतींनी त्यास आक्षेप घेतला व ही घोषणा रेकॉर्डवरून काढून टाकली जाईल, असं सांगितलं. त्यावरून राजकीय वादाला तोंड फुटलं आहे.
विरोधकांनी सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल केला आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून व्यंकय्या नायडू यांना ‘जय भवानी, जय शिवाजी’ असं लिहून २० लाख पोस्टकार्डे पाठवली जाणार आहेत. तर, व्यंकय्या नायडू यांनी माफी मागावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघानं केली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रवक्ते यांनीही भाजपवर तोफ डागली आहे. ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्यांच्या वंशजांनी केलेल्या घोषणाही चालत नाही. छत्रपतींच्या वंशजांना पुन्हा अतिशय मागच्या रांगेत ठेवून इतिहास पुनर्जिवित केला जात आहे. शिवरायांच्या आशीर्वाद असल्याचं सांगत सत्तेवर आलेला भाजप औरंगजेबासारखे राज्य चालवत आहे,’ असं टीकास्त्र सोडत सावंत यांनी भाजपचा निषेध केला आहे.
वाचा:
शिवसेनेचा संभाजी भिडेंना सवाल
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी या निमित्तानं ‘शिवप्रतिष्ठान’चे संभाजी भिडे यांना टोला हाणला आहे. छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या वंशजांचा दिल्ली दरबारी अपमान झाला की नाही याचे प्रमाणपत्र कोणी द्यायचे? भाजपाचे या विषयावर तोंड बंद आंदोलन सुरू झाले आहे. संभाजी भिडे यांच्याकडून सांगली, सातारा बंदची अदयाप घोषणा नाही,’ अशी खोचका टीका राऊत यांनी केली आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times