Devendra Fadnavis: काल रात्रीपासून महावितरण कर्मचारी संपावर होते. त्यानंतर आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत या संपावर तोडगा काढला. त्यानंतर कर्मचाऱ्यांनी हा संप मागे घेतला.

 

Devendra Fadnavis- mahavitar strike

हायलाइट्स:

  • महावितरण कर्मचाऱ्यांचा संप मागे
  • उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मध्यस्थी
  • वीज कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या घोषणा
मुंबई: राज्यातील महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी खासगीकरणाविरोधात ३ दिवसांचा संप पुकारला होता. मात्र, या संपाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तसेच उर्जामंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक केली. या बैठकीत वीज कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा निघाला आहे. त्यामुळे महावितरणने संप मागे घेतला आहे. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: पत्रकार परिषद घेत बैठकीत झालेल्या निर्णयांबाबत माहिती दिली.

महावितरणचे कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी वीज वितरण कंपन्यांच्या ३२ संघटनांशी चर्चा केली आणि ही चर्चा साकारात्मक झाल्याचं त्यांनी सांगितलं. राज्य सरकारला कंपन्यांचं खासगीकरण करायचं नाहीये, याउलट सरकार ३ कंपन्यांमध्ये ५० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे, असंही फडणवीसांनी सांगितलं.

त्यासोबतच सरकार वयोमर्यादा वाढवून कर्मचाऱ्यांची भरती करणार. महावितरणमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी सवलती वाढवणार, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here