रत्नागिरी: अवघ्या महिनाभरावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाताना चाकरमान्यांचा निर्धोक प्रवास व्हावा, यासाठी आवश्यक त्या सावधगिरीच्या सर्व उपाययोजनांसह विशेष रेल्वे गाडी सोडावी, अशी मागणी भाजपचे नेते आणि माजी खासदार यांनी केंद्रीय रेल्वे मंत्री यांच्याकडे केली आहे. ( On )

नीलेश राणे यांनी रेल्वे मंत्र्यांना याबाबत पत्र लिहिले आहे. आणि हे अतुट नाते आहे. मुंबईसह कुठेही असलेला कोकणी माणूस या उत्सवासाठी गावी येतोच. मात्र यावेळी करोनामुळे गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. या साथरोगामुळे चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशावेळी कोकणी माणसांसाठी कोकण रेल्वे हा एक विश्वासार्ह आणि उत्तम पर्याय राहिला आहे. त्यामुळे या गणेशोत्सवामध्ये कोकणी माणसाला त्याच्या गावी सुखरूप जाण्यासाठी आवश्यक त्या सर्व सावधगिरीच्या उपाययोजनांसह व्यवस्था करून कोकण रेल्वेच्या माध्यमातून विशेष रेल्वे गाड्यांची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नीलेश राणे यांनी या पत्राद्वारे रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्याकडे केली आहे.

वाचा:

कोकणच्या वाटेत अनेक विघ्ने

कोकणातील गणेशोत्सवाला वैभवशाली परंपरा आहे. कामानिमित्त बाहेरगावी असलेला कोकणी माणूस दरवर्षी न चुकता कुटुंबकबिल्यासह गणेशोत्सवासाठी आपल्या कोकणातील मूळगावी दाखल होतो. यंदा मात्र करोनामुळे या सर्वांच्याच पुढे अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रवासासाठी ई-पास, मेडिकल सर्टिफिकेट, गावी गेल्यावर १४ दिवस होम क्वारंटाइन, अशी अनेक विघ्ने आडवी आली आहेत. याबाबत शासनस्तरावर अनेक बैठका झाल्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड या तिन्ही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन आढावा घेतला. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आवश्यक सूचना दिल्या असल्या तरी अद्याप ठोस निर्णय झालेला नाही. कोकणात जाणाऱ्या चाकमान्यांची आधी करोना चाचणी होणार का, ई-पासची अट रद्द होणार का, एसटी बस सोडल्या जाणार का, विशेष रेल्वेगाड्या सोडल्या जाणार का, क्वारंटाइन किती दिवसांचे असणार, असे अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. यावरून राजकारणंही बरंच तापलं आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्यांची चोख व्यवस्था करावी. येथेच करोना चाचणी केल्यानंतर परत गावी जाऊन चाकरमान्यांना क्वारंटाइन राहण्याची अट घालू नये, अशी मागणी पाटील यांनी केली आहे तर नारायण राणे यांनी या प्रश्नावर प्रसंगी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

वाचा:

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here