पीएमपीच्या अध्यक्ष नयना गुंडे यांची जानेवारी महिन्यात आदिवासी कल्याण व संशोधन विभागाच्या आयुक्तपदी बदली झाली होती. रायगडचे तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे पीएमपीचा पदभार देण्यात आला होता. मात्र, सूर्यवंशी यांनी पीएमपीचा पदभार स्वीकारला नाही. त्यामुळे गुंडे आणि सूर्यवंशी या दोघांच्याही बदल्या रद्द करून गुंडे यांच्याकडेच पीएमपीची जबाबदारी सोपवली होती. त्यानंतर, मार्च महिन्यात गुंडे यांची ‘यशदा’मध्ये उपमहासंचालक म्हणून बदली झाली; परंतु गुंडे यांच्याकडे पीएमपीची अतिरिक्त जबाबदारी सोपविली होती.
वाचाः
जगताप हे मूळ भारतीय संरक्षण मालमत्ता सेवेतील २००१च्या बॅचचे अधिकारी आहेत. ते डेप्युटेशनवर पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून २०१४मध्ये दाखल झाले होते. त्यानंतर २०१७मध्ये स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. नोव्हेंबर २०१९मध्ये त्यांची बदली करण्यात आली होती.
पीएमपीला १२ वर्षांत १५ अध्यक्ष
पीएमटी आणि पीसीएमटीचे विलीनीकरण करून २००७मध्ये पीएमपीची स्थापन करण्यात आली. तेव्हापासून आतापर्यंत पीएमपीला १५ अध्यक्ष लाभले. त्यापैकी आर. एन. जोशी वगळता एकाही अधिकाऱ्याला तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. जोशी यांच्यानंतर गुंडे यांनी दोन वर्षे काम पाहिले. तसेच, १५ अध्यक्षांपैकी आठ अधिकारी अतिरिक्त कारभार पाहणारे होते.
वाचाः
जगतापांपुढे आव्हानांचा डोंगर
पीएमपी अध्यक्षापुढे संस्थेचे सक्षमीकरण करणे, पुणेकरांना चांगली सेवा देणे आणि संचित तोटा कमी करणे ही आव्हाने कायमच असतात. आता या आव्हानांबरोबरच करोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटातून पीएमपीला बाहेर काढण्याचे मोठे आव्हान जगताप यांच्यापुढे असणार आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times