अंबरनाथ: अंबरनाथच्या मोरीवली गावातून शिर्डीला जायला निघालेल्या भाविकांच्या बसला सिन्नर-शिर्डी महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १० जण मृत्यूमुखी पडले असून मोरीवली गावातील दोन कुटुंबातील ४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मोरीवली गावावर शोककळा पसरली आहे. अपघातात मृत पावलेले १० पैकी ८ जण अंबरनाथच्या मोरीवली गावातील आहेत.

अंबरनाथच्या मोरीवलीचे रहिवासी काल रात्री १५ बस करून शिर्डीला देवदर्शनासाठी निघाले होते. यातील एका बसचा पहाटेच्या सुमारास नाशिकच्या घोटी सिन्नर महामार्गावरील पाथरे गावाजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात १० जणांचा मृत्यू झाला. मोरीवली गावातील उबाळे आणि बारस्कर कुटुंबांवर काळाने घाला घातला. शिर्डीला निघालेले दोन्ही कुटुंबातील ४ जण मृत्यूमुखी पडले. मोरीवली गावातील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीचे मालक गेले अनेक वर्षे मोफत कर्मचारी आणि परिचयातील व्यक्तींना शिर्डीला देवदर्शनाला घेऊन जातात अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे.
दीड वर्षांपूर्वी बायको गेली, दुसऱ्या संसारासाठी लगीनघाई; अचानक पोलीस आले, अंगणातूनच ‘वरात’
अंबरनाथमधील उबाळे कुटुंबातील दोन मुली झाल्या पोरक्या
पत्नी वैशालीला शिर्डीला देवदर्शनाला जाण्याचे पास मिळाले आणि तिने आपल्या पतीकडे म्हणजे नरेशकडे साईबाबांच्या दर्शनाला जाण्याचा हट्ट धरला. नरेश उबाळे एका वाईन शॉपमध्ये काम करत असल्याने त्याला सुट्टी मिळत नसे. कुटुंबाला वेळ देण्यासाठी नरेश यांनीदेखील कधी नव्हे ती सुट्टी घेतली आणि गुरुवारी रात्री बसमधून निघाले.

नरेश यांना ३ मोठे भाऊ असून त्यांच्या घरातील एकूण १७ सदस्य देवदर्शनाला गेले होते. नरेश, पत्नी वैशाली, मुलगी निधी व मधुरा यांच्यासह शिर्डीला निघाले. पहाटे झालेल्या अपघातात नरेश उबाळे व वैशाली उबाळे यांचा मृत्यू झाला. तर ९ वर्षीय निधी ही गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. आई वडिलांच्या निधनाने निधी व मधुरा पोरक्या झाल्या आहेत.
दुर्गंधीमुळे जीव हैराण, वासामुळे शेजारी वैतागले; पालिकेला कळवले, दार उघडताच आत ५०० किलो…
अपघातात बारस्कर कुटूंबातील दोन जणांचा मृत्यू
मोरीवली गावातील सुहास बारस्कर, पत्नी आणि दोन मुलीसुद्धा याच बसूनमधून शिर्डीला निघाल्या होत्या. या अपघातात बारस्कर यांच्या पत्नी श्रद्धा आणि त्याची चिमुरडी मुलगी श्रावणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर सुहास बारस्कर आणि मोठी मुलगी शिवन्या हे बचावले आहेत.

मोरीवली गावातील महालक्ष्मी पॅकेजिंग कंपनीचे मालक गेले अनेक वर्षे मोफत कर्मचारी आणि ओळखीतल्या लोकांना शिर्डीला देवदर्शनाला घेऊन जातात. उबाळे आणि बारस्कर कुटुंब पहिल्यांदाच शिर्डीला गेले होते, असे स्थानिकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here