नामदेव शास्त्रींनाही टोला?
भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री आणि पंकजा मुंडे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. काही वर्षांपूर्वी नामदेव शास्त्री यांनी दसरा मेळाव्याला आक्षेप घेतला आणि भगवानबाबांचं जन्मगाव सावरगावात पंकजांच्या दसरा मेळाव्याची सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर पनवेलमधील कार्यक्रमात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे की, ‘मी गोपीनाथ गड का बांधला? त्याची दारं कुणासाठीही बंद होणार नाहीत, यासाठी तो शक्तीचा गड तयार केला.’
दरम्यान, नामदेव शास्त्री हे नुकतेच भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निकटवर्तीयाने आयोजित केलेल्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावरही उपस्थित राहिले होते. युवा दिनानिमित्त मुंबईत तर्पण युवा पुरस्कार झाला, त्यासाठी नामदेव शास्त्रींची खास उपस्थिती होती. या कार्यक्रमाचं आयोजन फडणवीसांचे खास असलेल्या श्रीकांत भारतीय यांनी केलं होतं. खुद्द श्रीकांत भारतीय नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच भगवानगडावरही गेले होते. नामदेव शास्त्रींना अनाथ आणि दिव्यांगांविषयी जो जिव्हाळा आहे त्यामुळेच त्यांना या कार्यक्रमासाठी बोलवण्यात आलं होतं, यात कोणताही राजकीय हेतू नाही, असंही स्पष्टीकरण भाजपमधील एका नेत्याने दिलं होतं.