औरंगाबाद: मुख्यमंत्री मुंबईत राहून राज्यभरातील करोना परिस्थितीचा आढावा घेत उपाययोजना करीत आहेत. ते दिवसभर त्याच कामात असतात. मुख्यमंत्र्यांची टीम राज्यभर फिरत असून कॅप्टननने फक्त नियंत्रण ठेवणे अपेक्षित असते, असे सांगत काँग्रेसचे अध्यक्ष खासदार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची पाठराखण केली. ते औरंगाबादमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. ( praised Chief Minister )

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री सुभाष देसाई यांनी शनिवारी औरंगाबाद जिल्ह्यातील करोना परिस्थितीचा आढावा घेतला. ८०व्या वर्षी तुम्ही फिल्डवर असताना मुख्यमंत्री का फिरत नाहीत, असा प्रश्न पत्रकारांनी पवार यांना विचारला. त्यावर पवार यांनी ठाकरे यांच्या कामाचे कौतुक करीत कार्यशैली समजावून सांगितली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईत असले तरी राज्यभरातील करोना परिस्थितीचा नियमित आढावा घेत आहेत. दिवसभर त्याच कामात ते बुडालेले असतात. पालकमंत्री आणि इतर मंत्री त्यांना प्रत्येक जिल्ह्यातील परिस्थिती आणि आवश्यक उपाययोजनांची माहिती सांगतात. त्यानुसार तातडीने उपाययोजना करण्यात येत आहेत. कॅप्टनने टीमवर नियंत्रण ठेवावे. त्यांची टीम राज्यभर फिरत आहे. एका जिल्ह्यात येऊन हाताळावी अशी परिस्थिती नाही. मुख्यमंत्र्यांचे काम योग्य पद्धतीने सुरू आहे, असे पवार म्हणाले. मला एका जागी बसवत नाही. मी लोकांमध्ये राहणारा माणूस असल्यामुळे फिरत असतो, असेही पवार म्हणाले. हा दौरा झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here