नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारणाचा केंद्रबिंदू राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशीही रंजक घडामोडी पाहायला मिळाल्या. या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरलेल्या सत्यजीत तांबे यांच्या विजयासाठी भाजपने पडद्यामागून सूत्रे हलवण्यास सुरुवात केल्याची चर्चा आहे. त्यासाठी देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी असलेले गिरीश महाजन नाशिकमध्ये ठाण मांडून आहेत. त्यामुळे आज सकाळपासूनच नाशिकमधील राजकीय हालचालींना वेग आला आहे.

आज सकाळपासून शुभांगी पाटील नॉट रिचेबल असल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले होते. शुभांगी पाटील यांनी उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची चर्चा होती. त्यामुळे गिरीश महाजन हे शुभांगी पाटील यांच्या संपर्कात असल्याची चर्चा होती. त्यामुळे शुभांगी पाटील उमेदवारी अर्ज मागे घेतील, अशीही हवाही पसरली होती. परंतु, ही शक्यता फोल ठरली. मात्र, यानंतर नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्यावरून शिवसेना ठाकरे गटात दोन मतप्रवाह दिसून येत आहे. नाशिक पदवीधर निवडणुकीसाठी ठाकरे गटाने शुभांगी पाटील यांना पाठींबा दर्शविला होता. मात्र एकीकडे शुभांगी अनरिचेबल आहेत तर दुसरीकडे शुभांगी पाटील यांना पाठिंबा देण्याऐवजी सुभाष जंगले यांना पाठिंबा द्यावा अशी मागणी ठाकरे गटाचे माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे. सुभाष जंगले नगर जिल्ह्यतील असून नगर जिल्ह्यात त्यांचे सर्वाधिक मतदार असून एक लाख मतदारांची नोंदणी केल्याचे शुभांगी पाटील खोट बोलत असल्याचा आरोप यावेळी माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केला आहे. तर सुभाष जंगले यांना पाठिंबा देण्यासाठी मी उद्धव ठाकरे यांच्यासह वरिष्ठ नेत्यांशी बोललो आहे, अशी माहिती देखील माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केली आहे. जंगले यांनी देखील मला महाविकास आघाडीचा पाठिंबा मिळेल म्हणून दावा केला होता. त्यामुळे येत्या काही तासांमध्ये काय घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सत्यजीत तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई? दिल्लीतून काँग्रेस हायकमांडच्या सूचना

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकी आज उमेदवारांचे अर्ज माघे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. त्यामुळे काही उमेदकारांचे परतीचे वारे सुरू झाले असून आज ४ अपक्ष उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे आता जे आपल्या उमेदवारीवर ठाम आहेत त्यांच्यासाठी ही निवडणूक काही अंशी सोपस्कार ठरणार आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लागल्यापासून अनेक ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. या अनेक घडामोडींमुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार असून नाशिकचे पदवीधर यंदा कोणाला कौल देणार, यात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
सत्यजीत तांबेंच्या विजयासाठी भाजपकडून राजकीय चक्रं फिरली, एका उमेदवाराची माघार, दुसरा नॉट रिचेबल?
आज सहा उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यात सत्यजित तांबे यांना चुरशीची लढत देणारा एकही उमेदवार नव्हता. मात्र अपक्ष उमेदवार शुभांगी पाटील यांनी ठाकरे गटाचा पाठिंबा मिळवत तांबे यांना थेट आव्हान दिले. त्यामुळे ही निवडणूक रंगतदार ठरणार हे नक्की.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here