औरंगाबाद-नगर रस्त्यावरील छावणी रेल्वे ब्रिजजवळ ट्रकबरोबर हा अपघात झाला होता. तेव्हापासून ऋषिकेशला धक्का बसला होता. तो कोणाशीही बोलत नव्हता. दोघे भाऊ दरवर्षी मकरसंक्रातीला पतंग उडवित असत. त्या आठवणीच्या तणाव व नैराश्यातून ऋषिकेशने रविवारी रात्री साडेनऊ वाजता घरात पंख्याला रुमाल बांधून गळफास घेतला.
हा प्रकार लक्षात येताच कुटुंबीयांनी पोलिसांना माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने ऋषिकेशला बेशुद्ध अवस्थेत घाटी रुग्णालयात आणले. रविवारी रात्री पावणेअकरा वाजता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.